शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

"सुरक्षेच्या बाबतीत भारत भाग्यवान नाही, लष्कराने शत्रूंपासून..."; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 08:17 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महू छावणीत भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित केले.

Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी जवानांना अंतर्गत आणि बाह्य शत्रूंवर बारीक नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. भारत सुरक्षेच्या बाबतीत फारसा भाग्यवान नाही आणि आपण सतत आव्हानांचा सामना करत असतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. आपल्या उत्तर आणि पश्चिम सीमांना सतत आव्हानांचा सामना करावा लागतो, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. त्यामुळे शत्रूंपासून सावध राहा असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महू छावणीत भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी लष्कराला सतर्क राहण्याचे आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. राजनाथ सिंह हे इंदूरमधील महू कॅन्टोन्मेंटच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. इंदूरपासून २५ किमी अंतरावर असलेल्या महू कॅन्टोन्मेंटमध्ये तीन प्रमुख प्रशिक्षण संस्था आहेत. ज्यामध्ये आर्मी वॉर कॉलेज, मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इन्फंट्री स्कूल यांचा समावेश आहे. याशिवाय येथे पायदळ संग्रहालय आणि आर्मी मार्क्समनशिप युनिट देखील आहे. 

"सुरक्षेच्या परिस्थितीचा विचार करता भारत हा फारसा भाग्यवान देश नाही. कारण आपली उत्तर सीमा आणि पश्चिम सीमा सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण अंतर्गत आव्हानांचा सामना करत आहोत. या पार्श्वभूमीवर आपण गाफील राहू शकत नाही. आपले शत्रू, मग ते अंतर्गत असोत की बाह्य, नेहमीच सक्रिय असतात. अशा परिस्थितीत आपल्याला कडक नजर ठेवावी लागेल. त्यांच्या हालचालींवर आपण लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांच्याविरूद्ध योग्य आणि वेळेवर प्रभावी पावले उचलली पाहिजेत," असं राजनाथ सिंह म्हणाले.

"भारताला २०४७ पर्यंत विकसित आणि स्वावलंबी देश बनवण्यासाठी लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाचा संरक्षण मंत्री या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जेव्हा मी इथं आलो आणि तुम्ही ज्या शिस्तबद्धतेने आणि समर्पणाने तुम्ही प्रशिक्षण घेत आहात ते पाहिले तेव्हा मी खूप प्रभावित झालो आह. तुमचे प्रशिक्षण हे कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही. अशी शिस्त राखण्यासाठी समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक असतो," असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवानMadhya Pradeshमध्य प्रदेश