शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"सुरक्षेच्या बाबतीत भारत भाग्यवान नाही, लष्कराने शत्रूंपासून..."; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 08:17 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महू छावणीत भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित केले.

Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी जवानांना अंतर्गत आणि बाह्य शत्रूंवर बारीक नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. भारत सुरक्षेच्या बाबतीत फारसा भाग्यवान नाही आणि आपण सतत आव्हानांचा सामना करत असतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. आपल्या उत्तर आणि पश्चिम सीमांना सतत आव्हानांचा सामना करावा लागतो, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. त्यामुळे शत्रूंपासून सावध राहा असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महू छावणीत भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी लष्कराला सतर्क राहण्याचे आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. राजनाथ सिंह हे इंदूरमधील महू कॅन्टोन्मेंटच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. इंदूरपासून २५ किमी अंतरावर असलेल्या महू कॅन्टोन्मेंटमध्ये तीन प्रमुख प्रशिक्षण संस्था आहेत. ज्यामध्ये आर्मी वॉर कॉलेज, मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इन्फंट्री स्कूल यांचा समावेश आहे. याशिवाय येथे पायदळ संग्रहालय आणि आर्मी मार्क्समनशिप युनिट देखील आहे. 

"सुरक्षेच्या परिस्थितीचा विचार करता भारत हा फारसा भाग्यवान देश नाही. कारण आपली उत्तर सीमा आणि पश्चिम सीमा सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण अंतर्गत आव्हानांचा सामना करत आहोत. या पार्श्वभूमीवर आपण गाफील राहू शकत नाही. आपले शत्रू, मग ते अंतर्गत असोत की बाह्य, नेहमीच सक्रिय असतात. अशा परिस्थितीत आपल्याला कडक नजर ठेवावी लागेल. त्यांच्या हालचालींवर आपण लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांच्याविरूद्ध योग्य आणि वेळेवर प्रभावी पावले उचलली पाहिजेत," असं राजनाथ सिंह म्हणाले.

"भारताला २०४७ पर्यंत विकसित आणि स्वावलंबी देश बनवण्यासाठी लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाचा संरक्षण मंत्री या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जेव्हा मी इथं आलो आणि तुम्ही ज्या शिस्तबद्धतेने आणि समर्पणाने तुम्ही प्रशिक्षण घेत आहात ते पाहिले तेव्हा मी खूप प्रभावित झालो आह. तुमचे प्रशिक्षण हे कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही. अशी शिस्त राखण्यासाठी समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक असतो," असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवानMadhya Pradeshमध्य प्रदेश