शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मानहानीचा खटला समन्स बजावण्यापूर्वीच फेटाळता येतो; SC कडून जवाहरलाल दर्डा खटल्याच्या निकालाचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 08:51 IST

या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध दाखल खटल्यात दिलेल्या निकालाचा पुनरुच्चार केला. 

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली :  आरोपीला समन्स बजावण्यापूर्वी न्यायदंडाधिकारी मानहानीची तक्रार फेटाळू शकतात. खटला सुरू करणे, ही गंभीर बाब आहे. खोट्या आणि फालतू तक्रारींना प्रतिबंध करणे, हे न्यायदंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध दाखल खटल्यात दिलेल्या निकालाचा पुनरुच्चार केला. 

एअरफिल्ड क्रॅश फायर टेंडर्सच्या पुरवठ्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने काढलेली निविदा एका कंपनीला वाटप झाल्यानंतर दुसऱ्या अयशस्वी बोलीदाराने प्रक्रियेत अनियमिततेची तक्रार केली. खोट्या तक्रारी दाखल करून प्रकाशित केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली. ती रद्द करण्यासाठी दाखल याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाने विचारार्थ घेतलेले प्रश्न मानहानीच्या प्रकरणांमध्ये आरोपीला समन्स बजावण्यापूर्वी दंडाधिकारी आपले न्यायिक विचार लागू करू शकतात काय आणि केलेल्या आरोपावरून बदनामीचा गुन्हा होत नसल्यास तक्रार रद्द करू शकतात का? न्यायालय : दंडाधिकारी यांना आपले न्यायिक विचार लागू करण्यात कोणतेही बंधन नाही. फालतू व अनावश्यक खटल्यांमुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जातो. तो वाचवणे मॅजिस्ट्रेट यांची जबाबदारी आहे. न्यायालये मानहानीची कारवाई रद्द करण्यासाठी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करू शकतात का?सर्वोच्च न्यायालय : तक्रार, तक्रारदार आणि साक्षीदार यांचे शपथेवरील जवाब आणि कागदोपत्री पुराव्याचे अवलोकन करून कोणताही गुन्हा घडला नसल्याचे स्पष्ट होत असल्यास आणि खटला चालू ठेवल्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर होईल, असे मत बनवल्यास उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे.  

जवाहरलाल दर्डा विरुद्ध मनोहर कापसीकर खटला काय होता? - सार्वजनिक हितासाठी वापरण्याच्या उद्देशाने सार्वजनिक निधी सोपवलेल्या लोकसेवकांच्या सार्वजनिक वर्तनाच्या संदर्भात बातमी प्रकाशित करणे बदनामी ठरत नाही.- मंत्र्याचे बोलणे खरे आहे, असे मानून आणि सद्भावनेने बातमी प्रकाशित केल्यास तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा वृत्तपत्राचा हेतू होता, असे म्हणता येणार नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाCourtन्यायालय