शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीचा निर्णय शहरांमधून जाणा-या महामार्गांसाठी लागू नाही, सर्वोच्च न्यायालयाने केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 14:20 IST

सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय शहरांमध्ये तसंच महापालिकेच्या अख्त्यारित येणा-या शहरांना लागू नसल्याचं स्पष्ट केलं आहे

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिला होताआपला निर्णय शहरांमध्ये तसंच महापालिकेच्या अख्त्यारित येणा-या शहरांना लागू नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहेउत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी पुढील आठवड्यात परवाना देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे

मुंबई, दि. 24 - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेली राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील दारुची दुकाने पुन्हा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे बार पुन्हा एकदा गजबजलेले दिसू शकतात. पुन्हा एकदा चिअर्स म्हणत लोक दारुच्या दुकानात बसून गप्पा मारताना दिसतील. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय शहरांमध्ये तसंच महापालिकेच्या अख्त्यारित येणा-या शहरांना लागू नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असणारी दारुची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता. यानंतर बारमालकांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला होता. मात्र आता न्यायालयाने आपल्या निर्णयात दुरुस्ती करत हा निर्णय फक्त दोन शहरांना जोडणा-या महामार्गांसाठी लागू असल्याचं सांगितलं आहे. तसंच हा आदेश महापालिका क्षेत्रातून जाणा-या रस्त्यांना लागू नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील म्हणजेच शहरांतील रस्त्यांवर असलेली दारू दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी पुढील आठवड्यात परवाना देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर शहरामध्ये हायवेला लागून असणारे सर्व बार सुरु होतील असं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. 

सरन्यायाधीश जे. एस. केहर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठासोर ही सुनावणी झाली. महामार्गावर होणारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिला होता. 

हायवेवरील दारूबंदीमुळे ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये 40 टक्के घटहायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली होती. 1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं होतं. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या 40 टक्क्याने घटल्यामुळे अपघाती मृत्यू तसंच जखमींचा आकडासुद्धा 11 ते 14 टक्क्यांनी घटला होता.  राज्य पोलिसांनी जमा केलेल्या माहितीनुसार हायवेवर होणाऱ्या किरकोळ अपघातांची संख्याही 21 टक्क्यांनी घटली होती.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय