शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
3
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
4
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?
5
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
6
Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान
7
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
8
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
9
नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...
10
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
11
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
12
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
13
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
14
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
15
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
16
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
17
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
18
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
19
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
20
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

घटनापीठाचा निर्णय खंडपीठांना बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 08:49 IST

हरयाणातील एका गावातील रहिवाशांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनीशी संबंधित एका प्रकरणात एप्रिल २०२२ मध्ये दिलेल्या निकालाचा हवाला सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : घटनापीठाचा निर्णय कमी संख्याबळ असलेल्या खंडपीठांना बंधनकारक असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी हरयाणातील एका गावातील रहिवाशांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनीशी संबंधित एका प्रकरणात एप्रिल २०२२ मध्ये दिलेल्या निकालाचा हवाला सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

हरयाणातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की, हरयाणा जमीन कायद्यानुसार मूळ मालकाकडून विशिष्ट कालावधीसाठी घेतलेल्या जमिनीवर ग्रामपंचायत मालकी हक्क सांगू शकत नाही. या जमिनीचे व्यवस्थापन व नियंत्रण ग्रामपंचायत करू शकते, पण ती ग्रामपंचायतीच्या मालकीची होऊ शकत नाही. केवळ वर्तमानातील नव्हे तर भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही जमीन मूळ मालकाकडून ग्रामपंचायतीने घेतली आहे. त्यामुळे या जमिनीचे व्यवस्थापन व नियंत्रण पुन्हा मालकाकडे जाऊ शकत नाही.  सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,  निकालाकडे दुर्लक्ष करणे, त्याच्या पूर्णपणे विरुद्ध निकाल देणे ही मोठी त्रुटी आहे.

‘यासाठी काेणत्या कायद्याची गरज नाही’

हरयाणा ग्राम सामायिक जमीन (नियंत्रण) कायदा, १९६१च्या कलम २(ग)च्या उपकलम ६ची कायदेशीर वैधता पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने तपासली होती. त्या न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. 

त्याचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. भूषण गवई व न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, घटनापीठाचा निर्णय कमी संख्याबळाच्या खंडपीठावर बंधनकारक असेल असे सांगण्यासाठी कोणत्याही कायद्याची आवश्यकता नाही. दोन न्यायाधीश असलेले खंडपीठ भगतराम प्रकरणात घटनापीठाने दिलेल्या निकालातल्या पाचव्या परिच्छेदातील उल्लेखांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय