मावळत्या रेल्वेमंत्र्यांनी क्षणात निर्णय बदलला

By Admin | Updated: May 18, 2014 00:49 IST2014-05-18T00:49:43+5:302014-05-18T00:49:43+5:30

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने मावळते रेल्वेमंत्री मल्लिकाजरुन खर्गे यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आणि त्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाला दोन दिवसांत दिल्या.

The decision of the moving trainmaker changed the momentum | मावळत्या रेल्वेमंत्र्यांनी क्षणात निर्णय बदलला

मावळत्या रेल्वेमंत्र्यांनी क्षणात निर्णय बदलला

>मुंबई : उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने मावळते रेल्वेमंत्री मल्लिकाजरुन खर्गे यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आणि त्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाला दोन दिवसांत दिल्या. त्यानुसार लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपताच एक्सप्रेस गाडय़ांच्या व उपनगरीय लोकलच्या भाडय़ात 1क् टक्क्यांनी वाढीचा निर्णय घेतला. तसेच याची अंमलबजावणी 2क् मेपासून लागू केली जाणार होती. मात्र मावळत्या रेल्वेमंत्र्यांनी क्षणार्धात निर्णयात बदलला आहे.
देशभरात रेल्वे प्रवाशांची संख्या क्.53 टक्क्यांनी घटली असून, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. आर्थिक बोजा वाढत चालल्याने रेल्वेच्या कर्मचा:यांचा पगारही देणो कठीण होत चालले आहे. त्याचप्रमाणो मोठी भाडेवाढ गेल्या काही वर्षात न केल्याने रेल्वेचे उत्पन्न वाढत नव्हते. हे पाहता 1क् टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आणि त्यावर रेल्वेमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. या भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांबरोबरच उपनगरीय लोकल प्रवाशांना खासकरून मुंबईतील लोकल प्रवाशांना फटका अधिक बसणार आहे. 
तसेच रेल्वेच्या मासिक आणि त्रैमासिक पासांच्या दरात मोठी वाढ होणार असल्याने मुंबईकरांच्या खिशाला तर कात्री लागणार आहे. ही भाडेवाढ होताना यावर 4.2 टक्के अधिभारही लागणार असल्याने पासाच्या दरात होणारी वाढ प्रवाशांना परवडणारी नाही. याची अधिसूचना रेल्वेकडून काढतानाच प्रसिद्धीपत्रकही लोकसभा मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळर्पयत काढण्यात आले होते.
मावळते रेल्वेमंत्री यांनी आपल्या निर्णयात बदल करीत येणा:या नवीन सरकारवर निर्णय घेण्याची जबाबदारी टाकली आणि आपला निर्णय त्वरित बदलून ही अधिसूचना मागे घेत असल्याचे सांगितले. या खेळीमुळे सरकारला सुरुवातीला निर्णयाचा फटका बसेल आणि त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जाईल, असे रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले. आता हा निर्णय नवीन सरकारच्या कोर्टात असून त्यांना रेल्वेच्या फायद्यासाठी भाडेवाढ करणो भागच पडेल, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 
कोकण रेल्वेच्या एसी डबल डेकरची चाचणी
कोकण रेल्वेच्या डबल डेकर एसी एक्सप्रेसची चाचणी शनिवारी रत्नागिरीर्पयत पार पडली. या चाचणीमुळे कोकण रेल्वे मार्गावर एसी एक्सप्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुरक्षाविषयक अंतिम अहवाल आल्यानंतरच ती सुरु केली जाणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. गेल्या आठवडय़ात मुंबईत कोकण रेल्वेच्या सीएसटी ते मडगावर्पयत धावणा:या डबल डेकर एसी एक्सप्रेसचे दहा डबे दाखल झाले. या एक्सप्रेसची चाचणी मडगावर्पयत केली जाणार असून चाचणीचा पहिला मुहूर्त शनिवारी करण्यात आला.

Web Title: The decision of the moving trainmaker changed the momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.