शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:52 IST

जनतेने निर्णय दिला आहे. विजयाबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू.

- शीलेश शर्मानिवडणुकीच्या निकालातून जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असे स्पष्ट करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून याबाबत कार्यकारिणी अंतिम निर्णय घेणार आहे, असेही स्पष्ट केले. परंतु कार्यकारिणीने गांधी यांनी अशा प्रकारे राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हैराण झालेल्या काँग्रेसला या पराभवामागची काय कारणे असावीत, हेच उमजेनासे झाले आहे.राहुल गांधी यांनी पराभवाच्या कारणांवर टिप्पणी करण्यास इन्कार करतांना सांगितले की, जनतेने दिलेला निर्णय मला मान्य आहे. आजच निकाल आलेला असल्याने आम्ही त्यासंबंधित कोणत्याही मुद्यांवर प्रतिक्रिया देणार नाही.उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारले असतांना राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, हा मुद्या माझ्या आणि कार्यकारिणी यांच्यातील आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलाविणार आहे. या बैठकीत पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यासोबत राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केल्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. आतापर्यंत मिळालेल्या संकेतानुसार कार्यकारिणी राहुल गांधी यांना अध्यक्षपद सांभाळण्याचा सल्ला देईल.जनता मालक आहे, असे मी प्रचारादरम्यान म्हणालो होतो, याची आठवण देत राहुल गांधी म्हणाले की, जनतेने आपला निर्णय दिलाआहे. विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. तथापि, ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू.अमेठीतील पराभव मान्य करुन राहुल यांनी स्मृती इराणी यांचेही अभिनंदन केले. अमेठीतील जनतेची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.काँग्रेसचे उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांना न खचता संघर्ष चालू ठेवण्याचा सल्ला दिला. प्रचारादम्यान विरोधकांकडून माझी अनेकदा निंदा करण्यात आली. असंसदीय शब्दांचा वापर करण्यात आला. अनेक आरोप करण्यात आले; परंतु, मी त्यांना प्रेमानेच उत्तर दिले. भविष्यातही मी असा वागणार आहे; कारण प्रेमाचा कधीही पराभव होत नसतो.पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया स्पष्ट दिसून येत होती. राहुल गांधी हताश झालेले दिसले. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देतांनाही ते पुरते गोंधळून गेलेले दिसले. अनेक प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. काँग्रेसच्या पराभवामागच्या कारणांबाबत नंतर सविस्तर बोलू, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस