शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सैन्य माघारीचा कालावधी ठरवा; भारताने चीनला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 06:22 IST

चिनी अ‍ॅपवर बंदी, थेट परकीय गुंतवणुकीत बदल करून भारताने चीनच्या नाड्या आवळल्या आहेत. हे केवळ तात्पुरते उपाय नसून भविष्यात याचे आर्थिक परिणाम दिसण्याची भिती आता चीन अभ्यासकांनी व्यक्त केल्याने ड्रॅगनचा सूर नरमला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवरून सैन्य माघारीसाठी केवळ चर्चा नव्हे तर दिवस निश्चित करा, असे भारताने चीनला खडसावले आहे. एकीकडे चर्चा करायची व दुसरीकडे सैन्याची जमवाजमव ही ड्रॅगनची कुटिल नीती राजनैतिक चर्चेदरम्यान भारताने उघडकीस आणली.

चिनी अ‍ॅपवर बंदी, थेट परकीय गुंतवणुकीत बदल करून भारताने चीनच्या नाड्या आवळल्या आहेत. हे केवळ तात्पुरते उपाय नसून भविष्यात याचे आर्थिक परिणाम दिसण्याची भिती आता चीन अभ्यासकांनी व्यक्त केल्याने ड्रॅगनचा सूर नरमला. तब्बल सहा तास झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी पूर्णपणे सैन्य माघारीची तयारी दर्शवली. वर्किंग मेकेनिझम फॉर कन्सल्टेशन अँड को आॅर्डीनेशनची सोळावी बैठक पार पडली.तत्पूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दिवसभर चर्चा झाली होती. त्यात ठरल्याप्रमाणे चीनने शब्द पाळावा, असे भारताने सुनावले.

बैठकीत संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. पंधरा जूनला झालेल्या हिंसक झटापटीनंतर सीमेवर शांतता राखण्यास दोन्ही देशांनी सहकार्य केल्याचा सूर बैठकीत उमटला. मात्र सीमावादाचे परिणाम आर्थिक तसेच राजनैतिक स्तरावर होवू न देण्याचे रडणागे चिनी अधिकाऱ्यांनी गायले. त्यावर जोपर्यंत शेवटच्या सैनिकाला माघारी बोलावण्याचा दिवस निश्चित करून त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आर्थिक संबंधांवर चर्चाही न करण्याचा खमकेपणा भारताने दाखवला. भारताने गेल्या सत्तर वर्षांच्या राजनैतिक संबंधांमध्ये पहिल्यांदाच अशी कठोर भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंडोनेशिया-भारताची जवळीकसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इस्त्रायलचे संरक्षण मंत्री जनरल बेंजामिन गँत्झ यांच्याशी संवाद साधला. इस्त्रायलकडून लष्करी इंटेलिजंन्स देवाणघेवाणीवर त्यात चर्चा झाली. विशेष म्हणजे इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री पारबो सबॅन्टो सोमवारी (२६ जुलै) भारत दौºयावर येत आहेत. दक्षिण चीन समुद्रात आता इंडोनेशियाने चीनविरोधात शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे इंडोनेशिया-भारताची जवळीक वाढली आहे.चिनी निर्यातीवर अवलंबून असलेल्या भारतीय उद्योगांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, मात्र चीनला धडा शिकवण्याचा हाच मार्ग असल्याचेही सूत्रांनी नमूद केले. दक्षिण चीन समुद्रात आॅस्ट्रेलिया, जपान व अमेरिकेसोबत हवाई युद्धनौकांचा अभ्यास व अत्याधुनिक शस्रास्रांची खरेदी केल्याने भारताने चीनलाही समज दिली.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव