शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:35 IST

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.

राजनांदगांव - छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने शेतकरी व आदिवासी यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.येथे प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशातील १२५ हून अधिक लोक रांगेत उभे राहून मरण पावले. मोदी सरकारने अख्ख्या देशाला रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. पण नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी देशाचा पैसा घेऊन परदेशात फरार झाले, तेव्हा हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसून राहिले. नोटाबंदी हा मोदींनी घेतलेला तुघलकी निर्णय होता आणि जीएसटी म्हणजे तर गब्बर सिंग टॅक्सच आहे, असा आरोपही त्यांनी केला.या देशातील तरुणांचा रोजगार घालवण्याचे कामच या पंतप्रधानांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी केले, शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळू दिला नाही आणि कर्जबुडव्या उद्योगपतींना मात्र बँकांतून अधिकाधिक पैसा दिला गेला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पंजाबमध्ये तसेच कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर लगेचच आम्ही शेतकºयांची सर्व कर्जे माफ करून दाखवली आहेत. (वृत्तसंस्था)नक्षलग्रस्त भागात घेणार प्रचार सभाराहुल गांधी २ दिवसांच्या छत्तीसगड दौºयावर आहेत. ते नक्षलग्रस्त भागांमध्ये काही सभा घेणार आहेत. तेथील पहिल्या टप्प्याचा प्रचार उद्या, शनिवारी दुपारी संपत आहे.त्याआधीची शेवटची काँग्रेसची सभाही तेच घेणार आहेत. नक्षलग्रस्त भागाच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018