शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

धक्कादायक! कर्जाच्या ओझ्यापायी शेतकऱ्याने केली आत्महत्या; शेतातच खाल्लं सल्फास अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:34 IST

Farmer Committed Suicide : कर्जाच्या ओझ्यापायी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाच्या ओझ्यापायी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 40 वर्षीय शेतकऱ्यावर तब्बल साडेतीन लाखांचं कर्ज होतं. बँकेने त्याला याबाबत एक नोटीस देखील पाठवली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांने टोकाचा निर्णय घेतला. अशोक असं या शेतकऱ्याचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून 70 किमी दूर असलेल्या सनावद पोलीस ठाण्याच्या परिसरातील मलगावमध्ये ही घटना घडली. अशोक याने शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याने मामे भाऊ लखनलाल भायडिया याला फोन करून मी शेतात सल्फास खाल्ल्याचं सांगितलं. हे समजताच लखनलाल आणि त्यांचे काही नातेवाईक हे तातडीने शेतात आले आणि उपचारासाठी अशोकला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

साडे तीन लाखांचं घेतलं होतं कर्ज

शेतकऱ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर उपचारासाठी त्याला इंदूर येथे घेऊन जा असा सल्ला देण्यात आला. मात्र इंदूर येथे घेऊन जातानाच रस्त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. लखनलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोककडे पाच एकर जमीन होती. बँक ऑफ इंडियाच्या बांगरदा शाखेतून त्याने साडे तीन लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्याने काही लोकांकडे पाच लाख उधार मागितलेले. पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

नाराज झालेल्या अशोकने त्यामुळेच सल्फास खाल्लं असेल असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एसपी सिद्धार्थ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसगाव येथे एका शेतकऱ्याने सल्फास खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर बँकेचं साडे तीन लाखांचं कर्ज होतं आणि त्यासाठी बँकेने त्याला नोटीस देखील पाठवली होती. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरी