शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या हुतात्म्यांहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:40 IST

देशात गेल्या पाच वर्षांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात १४ हजार ९२६ जण मरण पावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली : देशात गेल्या पाच वर्षांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात १४ हजार ९२६ जण मरण पावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. सीमेवर लढताना शहीद झालेल्या किंवा दहशतवाद्यांनी बळी घेतलेल्यांपेक्षा खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्यांची संख्या अधिक असावी. अशा दुर्घटना घडणे ही अतिशय शरमेची बाब आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. दीपक गुप्ता, न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, २०१३ ते २०१७ या कालावधीत खड्ड्यांमुळे मरण पावलेल्यांची आकडेवारी पाहून हेच दिसून येते. रस्ते सुरक्षा या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांची एक समिती नेमली होती.खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणांचा अभ्यास करून या समितीने तयार केलेल्या अहवालावर केंद्र सरकारने आपले मत सादर करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. अशा प्रकारे मृत्यू ओढविलेल्यांच्या वारसदारांना सरकारने भरपाई दिली पाहिजे, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले.>कर्तव्य पार पाडायासंदर्भात प्रसारमाध्यमांत झळकलेल्या वृत्तांची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ते सुरक्षाविषयक समितीने बारीक लक्ष घालावे. या विषयावर समितीने सरकारला काही शिफारसी कराव्यात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती याकडे नीट लक्ष दिल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल व मोठी जीवितहानीही टळेल.मात्र, त्यासाठी संबंधित अधिकारी, यंत्रणांनी आपले कर्तव्य चोख पार पाडले पाहिजे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय