शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या हुतात्म्यांहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:40 IST

देशात गेल्या पाच वर्षांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात १४ हजार ९२६ जण मरण पावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली : देशात गेल्या पाच वर्षांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात १४ हजार ९२६ जण मरण पावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. सीमेवर लढताना शहीद झालेल्या किंवा दहशतवाद्यांनी बळी घेतलेल्यांपेक्षा खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्यांची संख्या अधिक असावी. अशा दुर्घटना घडणे ही अतिशय शरमेची बाब आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. दीपक गुप्ता, न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, २०१३ ते २०१७ या कालावधीत खड्ड्यांमुळे मरण पावलेल्यांची आकडेवारी पाहून हेच दिसून येते. रस्ते सुरक्षा या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांची एक समिती नेमली होती.खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणांचा अभ्यास करून या समितीने तयार केलेल्या अहवालावर केंद्र सरकारने आपले मत सादर करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. अशा प्रकारे मृत्यू ओढविलेल्यांच्या वारसदारांना सरकारने भरपाई दिली पाहिजे, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले.>कर्तव्य पार पाडायासंदर्भात प्रसारमाध्यमांत झळकलेल्या वृत्तांची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ते सुरक्षाविषयक समितीने बारीक लक्ष घालावे. या विषयावर समितीने सरकारला काही शिफारसी कराव्यात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती याकडे नीट लक्ष दिल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल व मोठी जीवितहानीही टळेल.मात्र, त्यासाठी संबंधित अधिकारी, यंत्रणांनी आपले कर्तव्य चोख पार पाडले पाहिजे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय