शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

...तर बलात्‍कार्‍यास फाशी!, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी विधेयक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 12:47 IST

महिलांवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहेत. बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना रोखण्यासाठी सरकार, पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच महिलांना यांसारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही दिले जात आहे.

नवी दिल्ली - महिलांवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहेत. बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना रोखण्यासाठी सरकार, पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच महिलांना यांसारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही दिले जात आहे. पण हरयाणा सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशपाठोपाठ आता हरयाणातही बारा वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या शिक्षेची तरतूद असणारं विधेयक लवकरच विधानसभेत आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली आहे. याशिवाय बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्याचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

साधारणपणे बलात्काराच्या 75 टक्के घटनांमध्ये जवळचे नातेवाईकच असतात, असं मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितलं. राज्यातील बलात्काराच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलीस दिवस रात्र मेहनत घेत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. या आधी मध्यप्रदेश सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्याचं विधेयक मंजूर केलं होतं.  

असा आहे मध्यप्रधेशमधील नवा कायदा - 

नॅशनल रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीवरुन टीकेचा भडीमार सहन करणार्‍या मध्यप्रदेश सरकारने सोमवारी एक मजबूत पाऊल टाकले आहे. येथील विधानसभेने दंड विधी सुधारीत विधेयकास एकमताने मंजुरी दिली असून यावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर उमटताच याला कायद्याचे स्वरुप प्राप्‍त होणार आहे. या विधेयकात 12 वर्षांच्या आतील मुलीवर बलात्कार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नॅशनल रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, मध्यप्रदेशात देशातील सर्वात जास्त बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची 12 वर्षे पूर्ण केल्यानंतर ही आकडेवारी जाहीर झाली आहे.  या पार्श्‍वभूमीवर ‘12 साल बेमिसाल’ या भाजपच्या नार्‍याला ‘12 साल प्रदेश बेहाल’ असे विरोधकांनी उत्तर दिले आहे. 

जे लोक 12 वर्षांपर्यंतच्या निरागस मुलींवर बलात्कार करतात ते माणूस नसून पिशाच आहेत. त्यांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही. इतकेच नव्हे तर महिलेचा सातत्याने पाठलाग करणे हाही आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. महिलांसंदर्भातील गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीचाही आधार घेतला जाणार असल्याचे विधेयकास मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाHaryanaहरयाणा