शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काश्मिरात सहा महिन्यांत ९२ दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: July 7, 2017 01:56 IST

सुरक्षा जवानांनी या वर्षी काश्मीर खोऱ्यात सुरू केलेल्या मोहिमेत ९२ दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. ही संख्या २ जुलैपर्यंतची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सुरक्षा जवानांनी या वर्षी काश्मीर खोऱ्यात सुरू केलेल्या मोहिमेत ९२ दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. ही संख्या २ जुलैपर्यंतची आहे. २0१६मध्ये याच काळात ७९ दहशतवादी चकमकींमध्ये मारले गेले होते. या वर्षी ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या २0१२ वा २0१३ या दोन वर्षांहून अधिक आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये २0१२ रोजी ७२ तर २0१३मध्ये ६७ दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये ठार झाले होते. हा आकडा २0१४ साली वाढून ११0 वर पोहोचला. नंतर २0१५ साली १0८ तर २0१६मध्ये १५0 दहशतवादी काश्मीरमध्ये मारले गेले, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. या कारवाईचे श्रेय लष्कर, केंद्रीय दले राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वय यांना दिले जात आहे. दोन वर्षांत जे दहशतवादी मारले गेले, त्यात अनेक स्थानिक आणि बरेच पाकिस्तानीही आहेत. एवढेच नव्हे, तर बुऱ्हाण वणी आणि बशीर यांच्यासारख्या अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांचाही त्यात समावेश आहे. खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक देण्यात आली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्याआधी पूर्ण योजना तयार करण्यात येते. त्यामुळे सुरक्षा दलांचे कमीतकमी नुकसान होते आणि दहशतवादाविरोधी मोहीमही यशस्वी होते, असे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. काश्मीरमध्ये खातमा झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढली असताना, घुसखोरीची प्रकरणे कमी होत आहेत, असा दावा गृह मंत्रालयातर्फे करण्यात आला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, २0१६ साली घुसखोरीच्या ३७१ प्रकरणांची नोंद झाली. या वर्षी मे महिन्यापर्यंत हा आकडा १२४ असून, घुसखोरीच्या प्रयत्नांत असलेल्या अनेक दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलाने संपविले आहे. काश्मीरमध्ये उद्भवणारी कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज असून, त्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या २१४ तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांनी सांगितले. एका तुकडीत १०० जवान असतात. राज्य पोलीस दल आणि दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यास तैनात सुरक्षा दलाशिवाय काश्मीर खोऱ्यात हा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दगडफेक वाढलीदहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये या वर्षी खूपच वाढ झाली आहे. यंदा २ जुलैपर्यंत काश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या १६८ घटना घडल्या, तर २0१६ साली याच काळात केवळ १२६ दहशती कारवाया खोऱ्यात झाल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमध्ये यंदा वाढ झाली आहे. बुऱ्हाण वणी दिनाला इंग्लंडमध्ये प्रतिबंधभारताच्या विरोधामुळे बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलने बुऱ्हाण वणी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बर्मिंगहॅममध्ये काहींनी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले होते. भारत सरकारने त्याबद्दल नाराजी व्यक्त करून, त्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. बुऱ्हाण वणीला भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी गेल्या वर्षी ८ जुलै रोजी कंठस्नान घातले होते.  २१ हजार अतिरिक्त जवान तैनात; इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आदेशहिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेलेल्या चकमकीला शनिवारी एक वर्ष होत असून, त्यामुळे जम्मू-काश्मीर खोऱ्यात तीव्र निदर्शने होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अगदी चोख करण्यात आली आहे.विशेषत: अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात निमलष्करी दलाचे २१ हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्य पोलिसांनी पुढील आदेशापर्यंत इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सोशल मीडियाच्या सर्व साइटस् रोखण्याचे किंवा इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.