शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

श्राद्धाच्या ११ दिवसांनंतर 'मृत' महिला घरी परतली; चितेवर कोणाला जाळले? कुटुंबीय बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:01 IST

ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

Bihar News:बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, श्राद्धाच्या विधीही पूर्ण झाल्या, मात्र त्यानंतर ती महिला अचानक तिच्या घरी परतली. या घटनेने केवळ गावकऱ्यांनाच नाही, तर स्थानिक प्रशासनालाही आश्चर्यचकित केले आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ही घटना रविलगंजच्या मोहब्बत परसा पंचायतीतील भाडपा नया बस्तीची आहे. राम स्वरुप राय यांची पत्नी रमा देवी (४५ वर्षीय) १७ मे रोजी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. दरम्यान, २६ मे रोजी सरयू नदीच्या थाना घाटाच्या पूर्वेकडील तीरावर एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेला होता, परंतु मृतदेहाची उंची रमा देवीशी जुळत होती. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा मृतदेह रमा देवींचा असल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे शवविच्छेदन करुन तो कुटुंबाला सोपवण्यात आला. संपूर्ण गाव आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ११ जून रोजी रमा देवीचा श्राद्धविधीही पार पडला.

'मृत महिला जिवंत कशी असू शकते?'कुटुंबाने ही दुःखद घटना प्रारब्ध म्हणून स्वीकारली होती. पण, काल(२२ जून) सकाळी अचानक रमा देवी आपल्या घरी परतल्या. त्यांना दारात पाहून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. ही बातमी ऐकून गावकरी घरात जमले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, "मृत महिला जिवंत कशी असू शकते?"

इतके दिवस महिला कुठे होती?स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमा देवी मानसिकदृष्ट्या आजारी असून, कोणालाही न सांगता कोलकाता येथील त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. काही दिवस तिथे राहिल्यानंतर त्या स्वतःहून परतल्या. या काळात कुटुंबाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. नदीकाठी सापडलेला मृतदेह त्यांच्यासारखाच असल्याचे कुटुंबाने त्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले.

तपासाशिवाय मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आलेकुटुंबाने सांगितले की, नदीत सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला होता आणि त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते. आता रमा देवी सुखरूप परत आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा कायदेशीर गुंतागुंत वाढली असती. दरम्यान, ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? तिचा खून झाला का की, आणखी काही? पोलीस आता या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला