शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

श्राद्धाच्या ११ दिवसांनंतर 'मृत' महिला घरी परतली; चितेवर कोणाला जाळले? कुटुंबीय बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:01 IST

ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

Bihar News:बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, श्राद्धाच्या विधीही पूर्ण झाल्या, मात्र त्यानंतर ती महिला अचानक तिच्या घरी परतली. या घटनेने केवळ गावकऱ्यांनाच नाही, तर स्थानिक प्रशासनालाही आश्चर्यचकित केले आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ही घटना रविलगंजच्या मोहब्बत परसा पंचायतीतील भाडपा नया बस्तीची आहे. राम स्वरुप राय यांची पत्नी रमा देवी (४५ वर्षीय) १७ मे रोजी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. दरम्यान, २६ मे रोजी सरयू नदीच्या थाना घाटाच्या पूर्वेकडील तीरावर एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेला होता, परंतु मृतदेहाची उंची रमा देवीशी जुळत होती. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा मृतदेह रमा देवींचा असल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे शवविच्छेदन करुन तो कुटुंबाला सोपवण्यात आला. संपूर्ण गाव आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ११ जून रोजी रमा देवीचा श्राद्धविधीही पार पडला.

'मृत महिला जिवंत कशी असू शकते?'कुटुंबाने ही दुःखद घटना प्रारब्ध म्हणून स्वीकारली होती. पण, काल(२२ जून) सकाळी अचानक रमा देवी आपल्या घरी परतल्या. त्यांना दारात पाहून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. ही बातमी ऐकून गावकरी घरात जमले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, "मृत महिला जिवंत कशी असू शकते?"

इतके दिवस महिला कुठे होती?स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमा देवी मानसिकदृष्ट्या आजारी असून, कोणालाही न सांगता कोलकाता येथील त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. काही दिवस तिथे राहिल्यानंतर त्या स्वतःहून परतल्या. या काळात कुटुंबाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. नदीकाठी सापडलेला मृतदेह त्यांच्यासारखाच असल्याचे कुटुंबाने त्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले.

तपासाशिवाय मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आलेकुटुंबाने सांगितले की, नदीत सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला होता आणि त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते. आता रमा देवी सुखरूप परत आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा कायदेशीर गुंतागुंत वाढली असती. दरम्यान, ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? तिचा खून झाला का की, आणखी काही? पोलीस आता या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला