शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

श्राद्धाच्या ११ दिवसांनंतर 'मृत' महिला घरी परतली; चितेवर कोणाला जाळले? कुटुंबीय बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:01 IST

ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

Bihar News:बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, श्राद्धाच्या विधीही पूर्ण झाल्या, मात्र त्यानंतर ती महिला अचानक तिच्या घरी परतली. या घटनेने केवळ गावकऱ्यांनाच नाही, तर स्थानिक प्रशासनालाही आश्चर्यचकित केले आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ही घटना रविलगंजच्या मोहब्बत परसा पंचायतीतील भाडपा नया बस्तीची आहे. राम स्वरुप राय यांची पत्नी रमा देवी (४५ वर्षीय) १७ मे रोजी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. दरम्यान, २६ मे रोजी सरयू नदीच्या थाना घाटाच्या पूर्वेकडील तीरावर एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेला होता, परंतु मृतदेहाची उंची रमा देवीशी जुळत होती. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा मृतदेह रमा देवींचा असल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे शवविच्छेदन करुन तो कुटुंबाला सोपवण्यात आला. संपूर्ण गाव आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ११ जून रोजी रमा देवीचा श्राद्धविधीही पार पडला.

'मृत महिला जिवंत कशी असू शकते?'कुटुंबाने ही दुःखद घटना प्रारब्ध म्हणून स्वीकारली होती. पण, काल(२२ जून) सकाळी अचानक रमा देवी आपल्या घरी परतल्या. त्यांना दारात पाहून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. ही बातमी ऐकून गावकरी घरात जमले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, "मृत महिला जिवंत कशी असू शकते?"

इतके दिवस महिला कुठे होती?स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमा देवी मानसिकदृष्ट्या आजारी असून, कोणालाही न सांगता कोलकाता येथील त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. काही दिवस तिथे राहिल्यानंतर त्या स्वतःहून परतल्या. या काळात कुटुंबाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. नदीकाठी सापडलेला मृतदेह त्यांच्यासारखाच असल्याचे कुटुंबाने त्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले.

तपासाशिवाय मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आलेकुटुंबाने सांगितले की, नदीत सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला होता आणि त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते. आता रमा देवी सुखरूप परत आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा कायदेशीर गुंतागुंत वाढली असती. दरम्यान, ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? तिचा खून झाला का की, आणखी काही? पोलीस आता या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला