शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

श्राद्धाच्या ११ दिवसांनंतर 'मृत' महिला घरी परतली; चितेवर कोणाला जाळले? कुटुंबीय बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:01 IST

ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

Bihar News:बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, श्राद्धाच्या विधीही पूर्ण झाल्या, मात्र त्यानंतर ती महिला अचानक तिच्या घरी परतली. या घटनेने केवळ गावकऱ्यांनाच नाही, तर स्थानिक प्रशासनालाही आश्चर्यचकित केले आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ही घटना रविलगंजच्या मोहब्बत परसा पंचायतीतील भाडपा नया बस्तीची आहे. राम स्वरुप राय यांची पत्नी रमा देवी (४५ वर्षीय) १७ मे रोजी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. दरम्यान, २६ मे रोजी सरयू नदीच्या थाना घाटाच्या पूर्वेकडील तीरावर एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेला होता, परंतु मृतदेहाची उंची रमा देवीशी जुळत होती. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा मृतदेह रमा देवींचा असल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे शवविच्छेदन करुन तो कुटुंबाला सोपवण्यात आला. संपूर्ण गाव आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ११ जून रोजी रमा देवीचा श्राद्धविधीही पार पडला.

'मृत महिला जिवंत कशी असू शकते?'कुटुंबाने ही दुःखद घटना प्रारब्ध म्हणून स्वीकारली होती. पण, काल(२२ जून) सकाळी अचानक रमा देवी आपल्या घरी परतल्या. त्यांना दारात पाहून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. ही बातमी ऐकून गावकरी घरात जमले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, "मृत महिला जिवंत कशी असू शकते?"

इतके दिवस महिला कुठे होती?स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमा देवी मानसिकदृष्ट्या आजारी असून, कोणालाही न सांगता कोलकाता येथील त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. काही दिवस तिथे राहिल्यानंतर त्या स्वतःहून परतल्या. या काळात कुटुंबाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. नदीकाठी सापडलेला मृतदेह त्यांच्यासारखाच असल्याचे कुटुंबाने त्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले.

तपासाशिवाय मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आलेकुटुंबाने सांगितले की, नदीत सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला होता आणि त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते. आता रमा देवी सुखरूप परत आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा कायदेशीर गुंतागुंत वाढली असती. दरम्यान, ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? तिचा खून झाला का की, आणखी काही? पोलीस आता या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला