शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भयावह, भयानक, भीषण! गंगा नदीजवळ वाळूत अनेक मृतदेहांचं दफन; स्थानिकांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 16:23 IST

उत्तर प्रदेशच्या उन्नवमध्ये अनेक मृतदेहांचं दफन गंगा नदीच्या किनारी केलं जातंय. यामुळे स्थानिक चिंतेत आहेत

उन्नव: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला असून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात देशात दिवसाला ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मागील आठवड्याच्या तुलनेत परिस्थितीत काहीशी सुधारणा असली तरी देशातील मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहत आले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील भीषण वास्तव समोर आलं आहे.सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंतपूर्वांचल आणि बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह आढळून आल्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमधील प्रशासनानं हात वर करत जबाबदारी एकमेकांवर ढकलली. यानंतर आता उत्तर प्रदेशच्या उन्नवमधील एक भयानक दृश्य समोर आलं आहे. गंगा नदीच्या पात्रात असलेल्या वाळूत दोन ठिकाणी काही मृतदेह दफन करण्यात आले आहेत. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे.कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?शुक्लागंज हाजीपूरच्या रौतापूरमध्ये गंगा घाट आहे. या ठिकाणी असलेल्या वाळूमध्ये अनेक मृतदेह दफन करण्यात आले आहेत. या ठिकाणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडं कमी पडत असल्यानं काही हिंदू धर्मीयांनी पार्थिवांना अग्नी न देता ते दफन केल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रौतापूर घाट परिसरात गेल्या २० दिवसांपासून अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बुधवारी या ठिकाणी १६ जणांवर अंत्यसंस्कार झाले. त्यापैकी १३ जणांचे मृतदेह वाळूत दफन केलेल्या स्थितीत होते. पिपरी, लंगडापुरवा, मिर्झापूर, भटपुरवा, राजेपूर, कनिकामऊ यासह अनेक गावांमधील लोक इथे अंतसंस्कारांसाठी येतात.