शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:34 IST

DCM Pawan Kalyan Tirupati Laddu Controversy: या प्रकरणावर तसेच सनातन धर्मावरील होत असलेल्या टीकेबाबत का बोलू नये? प्रकाश राज यांनी यातून धडा घ्यायला हवा, असा सल्ला पवन कल्याण यांनी प्रत्युत्तर देताना दिला आहे.

DCM Pawan Kalyan Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिरात लाडू प्रसादाच्या वादावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी चार तासांचे शांती होम पंचगव्य प्रोक्षण करण्यात आले. होमहवन पहाटे ६ वाजता सुरू झाले आणि १० पर्यंत चालले. भगवान व्यंकटेश्वर यांचे पावित्र्य पुन्हा बहाल करण्याच्या उद्देशाने आणि भाविकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा विधी करण्यात आला. यानंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देवाची माफी मागणार असल्याचे म्हटले आहे. 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांनी या वादाप्रकरणी ११ दिवसांची प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा घटना रोखू शकलो नाही, याची खंत वाटते, असे पवन कल्याण यांनी म्हटले आहे. पवन कल्याण यांनी विजयवाडा येथील दुर्गा मल्लेश्वर स्वामी मंदिरात स्वच्छता, साफ सफाई केली. पवन कल्याण ०१ ऑक्टोबरपर्यंत प्रायश्चित घेणार आहेत. यानंतर ते तिरुपती बालाजी व्यंकटेश मंदिरात जाऊन देवाकडे क्षमा मागणार आहेत. 

प्रकाश राज यांच्या टीकेला पवन कल्याण यांचे प्रत्युत्तर

प्रकाश राज यांना प्रत्युत्तर देताना पवन कल्याण यांनी सांगितले की, या प्रकरणात का बोलू नये? प्रकाश राज तुमचा आदर करतो. धर्मनिरपेक्षतेचा विचार केला तर ते म्युच्युअल असले पाहिजे. मला समजत नाही की, तुम्ही माझ्यावर टीका का करत आहात? सनातन धर्मावरील होत असलेल्या टीकेबाबत मी बोलू शकत नाही का? प्रकाश राज यांनी यातून धडा घ्यायला हवा. चित्रपटसृष्टीने किंवा कोणीही हा विषय सामान्य समजू नये, सनातन धर्माबाबत मी खूप गंभीर आहे, असे पवन कल्याण यांनी स्पष्ट केले. तसेच सनातन धर्म सर्वांत महत्त्वाचा आहे. या बाबतीत प्रत्येक हिंदूने जबाबदारी घेतली पाहिजे. इतर कोणत्याही धर्मात असे घडले असते तर फार मोठे आंदोलन झाले असते, असे पवन कल्याण म्हणाले.

दरम्यान, प्रिय मित्रा, तू ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेस, त्या राज्यात ही घटना घडली आहे. कृपया तू चौकशी लावावी. या घटनेमागे दोषी कोण आहेत, ते शोधून काढावे आणि त्यांना कठोर शिक्षा करावी. पण हा विषय राष्ट्रीय पातळीवर तापवण्यात काय अर्थ आहे. आधीच देशात धार्मिक तणाव कमी आहे का… (याबद्दल तुझ्या दिल्लीतील मित्रांचे आभार), अशी पोस्ट प्रकाश राज यांनी केली होती. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटPrakash Rajप्रकाश राजAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारण