शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:34 IST

DCM Pawan Kalyan Tirupati Laddu Controversy: या प्रकरणावर तसेच सनातन धर्मावरील होत असलेल्या टीकेबाबत का बोलू नये? प्रकाश राज यांनी यातून धडा घ्यायला हवा, असा सल्ला पवन कल्याण यांनी प्रत्युत्तर देताना दिला आहे.

DCM Pawan Kalyan Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिरात लाडू प्रसादाच्या वादावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी चार तासांचे शांती होम पंचगव्य प्रोक्षण करण्यात आले. होमहवन पहाटे ६ वाजता सुरू झाले आणि १० पर्यंत चालले. भगवान व्यंकटेश्वर यांचे पावित्र्य पुन्हा बहाल करण्याच्या उद्देशाने आणि भाविकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा विधी करण्यात आला. यानंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देवाची माफी मागणार असल्याचे म्हटले आहे. 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांनी या वादाप्रकरणी ११ दिवसांची प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा घटना रोखू शकलो नाही, याची खंत वाटते, असे पवन कल्याण यांनी म्हटले आहे. पवन कल्याण यांनी विजयवाडा येथील दुर्गा मल्लेश्वर स्वामी मंदिरात स्वच्छता, साफ सफाई केली. पवन कल्याण ०१ ऑक्टोबरपर्यंत प्रायश्चित घेणार आहेत. यानंतर ते तिरुपती बालाजी व्यंकटेश मंदिरात जाऊन देवाकडे क्षमा मागणार आहेत. 

प्रकाश राज यांच्या टीकेला पवन कल्याण यांचे प्रत्युत्तर

प्रकाश राज यांना प्रत्युत्तर देताना पवन कल्याण यांनी सांगितले की, या प्रकरणात का बोलू नये? प्रकाश राज तुमचा आदर करतो. धर्मनिरपेक्षतेचा विचार केला तर ते म्युच्युअल असले पाहिजे. मला समजत नाही की, तुम्ही माझ्यावर टीका का करत आहात? सनातन धर्मावरील होत असलेल्या टीकेबाबत मी बोलू शकत नाही का? प्रकाश राज यांनी यातून धडा घ्यायला हवा. चित्रपटसृष्टीने किंवा कोणीही हा विषय सामान्य समजू नये, सनातन धर्माबाबत मी खूप गंभीर आहे, असे पवन कल्याण यांनी स्पष्ट केले. तसेच सनातन धर्म सर्वांत महत्त्वाचा आहे. या बाबतीत प्रत्येक हिंदूने जबाबदारी घेतली पाहिजे. इतर कोणत्याही धर्मात असे घडले असते तर फार मोठे आंदोलन झाले असते, असे पवन कल्याण म्हणाले.

दरम्यान, प्रिय मित्रा, तू ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेस, त्या राज्यात ही घटना घडली आहे. कृपया तू चौकशी लावावी. या घटनेमागे दोषी कोण आहेत, ते शोधून काढावे आणि त्यांना कठोर शिक्षा करावी. पण हा विषय राष्ट्रीय पातळीवर तापवण्यात काय अर्थ आहे. आधीच देशात धार्मिक तणाव कमी आहे का… (याबद्दल तुझ्या दिल्लीतील मित्रांचे आभार), अशी पोस्ट प्रकाश राज यांनी केली होती. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटPrakash Rajप्रकाश राजAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारण