दाऊद आणि हाफिजला भारताच्या स्वाधीन करा!
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:32+5:302014-12-18T22:39:32+5:30
दाऊद आणि हाफिजला भारताच्या स्वाधीन करा!

दाऊद आणि हाफिजला भारताच्या स्वाधीन करा!
द ऊद आणि हाफिजला भारताच्या स्वाधीन करा!भारताची पाकिस्तानकडे मागणीनवी दिल्ली : पाकिस्तान जर दहशतवादाविरुद्ध लढण्यात खरोखरच गंभीर असेल तर या शेजारी राष्ट्राने मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी हाफिज सईद आणि देशाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम या दोघांना भारताच्या स्वाधीन करावे, असे आवाहन संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केले आहे.पेशावर येथील सैनिक शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा पाकिस्तानने फायदा घ्यावा आणि दहशतवादाचा बीमोड करण्याच्या दिशेने कठोर पाऊल उचलावे. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात लढण्यात खरोखरच गंभीर असेल तर त्याने आधी हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम या दोघांना अटक करून भारताच्या स्वाधीन केले पाहिजे. नवाज शरीफ या संधीचा फायदा घेतील आणि दहशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलतील, अशी आशा आहे, असे नायडू म्हणाले. संसदेबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. हाफिज हा जगातील दहशतवादाचा मुख्य प्रवर्तक आहे. तो मानवतेचा शत्रू आहे, असेही नायडू म्हणाले.लखवीच्या जामिनाला विरोध२००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकिऊर रहमान लखवी याला मिळालेल्या जामिनाचा विरोध करण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानमधील आपल्या उच्चायुक्त कार्यालयाच्या संपर्कात आहे.मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा कट रचणे आणि हल्लेखोरांना मदत पुरविण्याचा आरोप असलेल्या सात जणांना पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या सात जणांमध्ये लखवी हा एक आहे. त्याला जामीन मिळाल्यानंतर लगेच भारताने इस्लामाबादेतील आपल्या दूतावासाशी संपर्क साधून या जामिनाला जोरदार विरोध करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.लखवी आणि अन्य सहा जणांनी बुधवारी जामीन अर्ज दाखल केला होता. फेडरल इन्व्हेस्टीगेशन एजंसीने त्यांना जामीन देण्यास विरोध केला. मात्र लखवीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या सर्वांचा जामीन मंजूर केला. (वृत्तसंस्था)