शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दुरान्तो एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरांचा सत्कार; शेकडो प्रवाशांचे दोघांनी वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:58 AM

मध्य रेल्वेवर वाशिंद व आसनगाव दरम्यान पावसाने दरड कोसळल्याने २९ आॅगस्ट रोजी सकाळी नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रुळांवरून घसरूनही प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे बोर्डाने दोन्ही ड्रायव्हरचा शनिवारी सत्कार केला.

नवी दिल्ली : मध्य रेल्वेवर वाशिंद व आसनगाव दरम्यान पावसाने दरड कोसळल्याने २९ आॅगस्ट रोजी सकाळी नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रुळांवरून घसरूनही प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे बोर्डाने दोन्ही ड्रायव्हरचा शनिवारी सत्कार केला.१० दिवसांत चार गाड्या रुळांवरून घसरल्यानंतर टीका होत असताना, रेल्वेने या दोन कर्तव्यदक्ष कर्मचाºयांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ‘दुरान्तो’चे ड्रायव्हर वीरेंद्र सिंग (५२ वर्षे) व सहाय्यक ड्रायव्हर अभय कुमार पाल (३२) यांचा रेल्वे बार्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी प्रशस्तिपत्र व अनुक्रमे १० हजार व पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव केला. हे दोघेही मध्य रेल्वेचे कर्मचारी आहेत. या दोघांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता व प्रसंगावधान राखून ते खरे ‘रेल्वेमन’ असल्याची प्रचिती दिली, असे लोहाणी म्हणाले.रेल्वच्या प्रशस्तिपत्रात नमूद केले गेले की, मोठे वळण व मुसळधार पाऊस, यामुळे रुळांवर दरड कोसळल्याचे ऐनवेळी लक्षात येताच या दोघांनी इमर्जन्सी ब्रेक लावले. परिणामी, रुळांवर कोसळलेल्या दगड-मातीवर गाडी येऊन आपटली, तेव्हा तिचा वेग खूपच कमी झाला होता. अचानक ब्रेकमुळे इंजिन व नऊ डबे घसरले, पण मोठा अनर्थ टळला. तशा आणीबाणीच्या वेळीही कुमार व पाल यांनी मन शांत ठेवून नियंत्रण कक्षाशी लगेच संपर्क साधला आणि अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवरील वीजपुरवठा तत्काळ बंद करायला लावला. त्यामुळेही अपघाताचा संभाव्य धोका कमी झाला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे