शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुलगी लंडनमध्ये खासदार...कोण आहे शेख रेहाना?; ज्यांच्यासोबत भारतात आहेत शेख हसीना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 17:51 IST

बांगलादेशात हिंसक आंदोलन भडकल्यानंतर आंदोलनकर्ते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले. तत्पूर्वी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात दाखल झाल्या. 

नवी दिल्ली - बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या. शेख हसीना काही काळ भारतात राहून लंडन किंवा फिनलँडला जाऊ शकतात असं बोललं जातं. शेख हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण शेख रेहाना यादेखील आहेत. बहिणीसोबत शेख हसीना या लंडनमध्ये शरण जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु शेख हसीना यांची बहीण कोण आणि त्यांच्या कुटुंबाचं राजकारणात किती योगदान आहे? त्यांचे लंडनशी कनेक्शन काय असे विविध प्रश्न अनेकांना पडले असतील तर याबाबतच जाणून घेऊया.

कोण आहे शेख रेहाना?

शेख रेहाना, या शेख हसीना यांची छोटी बहीण आहे. शेख हसीना यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते परंतु १९७५ साली त्या सर्वांची हत्या करण्यात आली होती. १९७५ मध्ये बांगलादेशात असाच काही उद्रेक घडला होता तेव्हा शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान, आई आणि ३ मुलींची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी शेख हसीना बांगलादेशात नव्हत्या. त्यांचे पती वाजिद मिया आणि छोटी बहीण रेहानासोबत त्या जर्मनीत होत्या. त्यामुळे या दोन्ही बहिणींचा जीव वाचला. 

रेहाना यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५५ साली झाला. त्या बांगलादेशचे राष्ट्रपिता असणारे शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबातील सर्वात छोटी मुलगी आहे. शेख रेहाना यांचं सुरुवातीचं शिक्षण शाहीन स्कूलमध्ये झालं. १९७१ साली जेव्हा बांगलादेशात मुक्तीसंग्राम सुरू होतं तेव्हा पाकिस्तानी फौजेने शेख रेहाना यांनाही नजरकैद केले होते. १९७५ साली त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या झाल्यानंतर त्या जर्मनीतून भारतात आल्या. त्यावेळी जवळपास दोन्ही बहिणी ६ वर्ष भारतात राहिल्या. त्यानंतर बांगलादेशात गेल्या. रेहाना कुटुंबातील राजकीय पक्षात सक्रीय नाहीत परंतु पडद्यामागून त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

शेख रेहाना यांनी १९७५ साली त्यांच्या वडिलांच्या हत्येचा मुद्दा जागतिक स्तरावर अनेकदा उचलला. १९७९ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये एका आंतरराष्ट्रीय संमेलनात आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. १० मे १९७९ साली त्यांनी ऑल युरोपीय बकशाल संमेलनात असं भाषण दिलं ज्यामुळे त्यांना जागतिक ओळख मिळाली. या संमेलनात युरोपीय देशातील प्रमुख, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय एनजीओचे अनेक ज्येष्ठ सदस्य होते. 

कुटुंबात कोण कोण आहे?

शेख रेहाना यांचे लग्न शफीक सिद्धिकी यांच्याशी झालं. ज्यांचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं योगदान मानलं जाते. शफीक सिद्धिकी ढाका यूनिवर्सिटीत प्रोफेसर राहिलेत. रेहाना यांना ३ मुले आहेत. एक मुलगा आणि २ मुली. त्यांच्या मुलाचं नाव रादवान सिद्धिकी, मुलगी तुलीप आणि अजमीना सिद्धिकी अशी नावे आहेत. रादवान ढाकाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करतात. त्यासोबत आवामी लीगच्या रिसर्च इन्सिट्यूटमध्ये त्यांचे योगदान आहे. मोठी मुलगी तुलीप सिद्धिकी ब्रिटीश संसदेची सदस्या आहे. त्याशिवाय आणखी एक मुलगी कंट्रोल रिस्क्समध्ये ग्लोबर रिस्क एनालिसिस एडिटर या पदावर आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत