शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

'डाटाचा गैरवापर खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 00:22 IST

रविशंकर प्रसाद यांचा इशारा; देशात डाटा विश्लेषणाचे आगार बनवण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली : भारताला डाटा विश्लेषणाचे आगार बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; परंतु लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी डाटाचा गैरवापर अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा आयटी व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.सीबीआयने फेसबुक, केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका व ग्लोबल सायन्स रिसर्च या संस्थांना पत्र लिहून डाटा संकलन व्यवस्थेची माहिती मागितली.या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारत डाटा विश्लेषण क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र बनावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु या डाटाचा वापर लोकशाहीवर प्रभाव टाकण्यासाठी कंपन्या करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. स्वच्छता अभियानातील एका कार्यक्रमात प्रसाद म्हणाले की डाटा फुटीप्रकरणी फेसबुकने याआधीच माफी मागून सुधार कृती करण्याचे आश्वासन दिले आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने सुरुवातीला उत्तर दिले होते, नंतर मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद नाही. त्यामुळे हे प्रकरण आम्ही तपासासाठी सीबीआयकडे पाठविले आहे.मागवला खुलासावर्षाच्या सुरुवातीला ८७ लाख वापरकर्त्यांचा डाटा फुटल्याप्रकरणी फेसबुक व केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाविरुद्ध क्षोभ निर्माण झाला होता. जगभरातील सरकारांकडून याबाबत कंपन्यांवर टीकेची झोड उठली होती.फेसबुक युजर्सचा डाटा अनेक देशांतील निवडणुकांसाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. सावध झालेल्या भारत सरकारने दोन्ही कंपन्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या. सीबीआयनेही आता या कंपन्यांकडून त्यांचे म्हणणे मागविले आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट