शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

ब्रेक फेल झालेला असतानाही 350 किलोमीटरपर्यंत पळवण्यात आली दरभंगा एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 13:50 IST

दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते.

ठळक मुद्देब्रेक फेल झालेले असतानाही दरभंगा एक्स्प्रेस 350 किमीपर्यंत चालवण्यात आलीमंगळवारी दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होताट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते

मुंबई, दि. 15 -  एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरु करण्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे रेल्वेचा दर्जा मात्र अजिबात सुधारताना दिसत नाहीये. ब्रेक फेल झालेले असतानाही दरभंगा एक्स्प्रेस 350 किमीपर्यंत चालवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून चालवण्यात आलेल्या याच एक्स्प्रेसचे ब्रेक गुरुवारी परतीच्या प्रवासावेळी पुन्हा एकदा फेल झाले होते. 

रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य यांत्रिक अभियंत्यांना पत्र लिहून ब्रेक फेल झाल्यासंबंधी माहिती दिली होती. मात्र अधिकारी असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचा दावा करत आहेत. 

गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघातांची मालिका झाली असतानाही रेल्वे मात्र कोणताही धडा शिकायला तयार नसल्याचं दिसत आहे. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशात रेल्वे अपघात होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवायदेखील अनेक अपघात झाले होते. त्यातच मंगळवारी 2000 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत असलेली दरभंगा एक्स्प्रेस ब्रेक फेल झाले असतानाही 350 किमीपर्यंत पळवण्यात आली. 

13 सप्टेंबर रोजी रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी मुख्य यांत्रिक अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात, मुंबईकडे जाणा-या दरभंगा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसच्या ब्रेकमध्ये पॉवर नसल्याचा उल्लेख केला होता. हे अत्यंत गंभीर असून, मोठी दुर्घटना होऊ शकते असंही पत्रातून सांगण्यात आलं होतं. 

उत्तर केंद्रीय रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांचं म्हणणं आहे की, 'रेल्वे बोर्डाकडून आलेल्या कोणत्याही पत्राबद्दल मला कल्पना नाही. माझ्या माहितीनुसार, जेव्हा एक्स्प्रेस दरभंगाहून रवाना झाली असेल तेव्हा रस्त्यात ब्रेक फेल झाले असावेत. जेव्हा या बिघाडाची माहिती मिळाली तेव्हा सोनपूर स्थानकावर तांत्रिक विभागाने तपास केला. मात्र त्यावेळी काहीच बिघाड नसल्याचं लक्षात आलं. ट्रेनमध्ये काही बिघाड आहे का, हे पाहण्यासाठी त्यांच्यातील एकाने छपरापर्यंत प्रवासही केला. ब्रेकमध्ये पॉवर कमी असल्याचं लक्षात आलं तेव्हा छपरा स्थानकावर पुन्हा पाहणी करण्यात आली'.

राजेश कुमार यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'बिघाड अत्यंत साधा असल्याने टेक्निकल एक्स्पर्टने दुरुस्ती केली. वाराणसीत पुन्हा तपासणी करण्यात आली. जेव्हा टेक्निकल एक्सपर्टची खात्री पडली तेव्हा ट्रेन रवाना करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही याची काळजी घेतली गेली होती. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात असून, कारणांचाही शोध घेतला जात आहे'.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी