शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

ब्रेक फेल झालेला असतानाही 350 किलोमीटरपर्यंत पळवण्यात आली दरभंगा एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 13:50 IST

दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते.

ठळक मुद्देब्रेक फेल झालेले असतानाही दरभंगा एक्स्प्रेस 350 किमीपर्यंत चालवण्यात आलीमंगळवारी दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होताट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते

मुंबई, दि. 15 -  एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरु करण्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे रेल्वेचा दर्जा मात्र अजिबात सुधारताना दिसत नाहीये. ब्रेक फेल झालेले असतानाही दरभंगा एक्स्प्रेस 350 किमीपर्यंत चालवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून चालवण्यात आलेल्या याच एक्स्प्रेसचे ब्रेक गुरुवारी परतीच्या प्रवासावेळी पुन्हा एकदा फेल झाले होते. 

रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य यांत्रिक अभियंत्यांना पत्र लिहून ब्रेक फेल झाल्यासंबंधी माहिती दिली होती. मात्र अधिकारी असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचा दावा करत आहेत. 

गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघातांची मालिका झाली असतानाही रेल्वे मात्र कोणताही धडा शिकायला तयार नसल्याचं दिसत आहे. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशात रेल्वे अपघात होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवायदेखील अनेक अपघात झाले होते. त्यातच मंगळवारी 2000 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत असलेली दरभंगा एक्स्प्रेस ब्रेक फेल झाले असतानाही 350 किमीपर्यंत पळवण्यात आली. 

13 सप्टेंबर रोजी रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी मुख्य यांत्रिक अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात, मुंबईकडे जाणा-या दरभंगा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसच्या ब्रेकमध्ये पॉवर नसल्याचा उल्लेख केला होता. हे अत्यंत गंभीर असून, मोठी दुर्घटना होऊ शकते असंही पत्रातून सांगण्यात आलं होतं. 

उत्तर केंद्रीय रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांचं म्हणणं आहे की, 'रेल्वे बोर्डाकडून आलेल्या कोणत्याही पत्राबद्दल मला कल्पना नाही. माझ्या माहितीनुसार, जेव्हा एक्स्प्रेस दरभंगाहून रवाना झाली असेल तेव्हा रस्त्यात ब्रेक फेल झाले असावेत. जेव्हा या बिघाडाची माहिती मिळाली तेव्हा सोनपूर स्थानकावर तांत्रिक विभागाने तपास केला. मात्र त्यावेळी काहीच बिघाड नसल्याचं लक्षात आलं. ट्रेनमध्ये काही बिघाड आहे का, हे पाहण्यासाठी त्यांच्यातील एकाने छपरापर्यंत प्रवासही केला. ब्रेकमध्ये पॉवर कमी असल्याचं लक्षात आलं तेव्हा छपरा स्थानकावर पुन्हा पाहणी करण्यात आली'.

राजेश कुमार यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'बिघाड अत्यंत साधा असल्याने टेक्निकल एक्स्पर्टने दुरुस्ती केली. वाराणसीत पुन्हा तपासणी करण्यात आली. जेव्हा टेक्निकल एक्सपर्टची खात्री पडली तेव्हा ट्रेन रवाना करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही याची काळजी घेतली गेली होती. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात असून, कारणांचाही शोध घेतला जात आहे'.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी