शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

ब्रेक फेल झालेला असतानाही 350 किलोमीटरपर्यंत पळवण्यात आली दरभंगा एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 13:50 IST

दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते.

ठळक मुद्देब्रेक फेल झालेले असतानाही दरभंगा एक्स्प्रेस 350 किमीपर्यंत चालवण्यात आलीमंगळवारी दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होताट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते

मुंबई, दि. 15 -  एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरु करण्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे रेल्वेचा दर्जा मात्र अजिबात सुधारताना दिसत नाहीये. ब्रेक फेल झालेले असतानाही दरभंगा एक्स्प्रेस 350 किमीपर्यंत चालवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून चालवण्यात आलेल्या याच एक्स्प्रेसचे ब्रेक गुरुवारी परतीच्या प्रवासावेळी पुन्हा एकदा फेल झाले होते. 

रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य यांत्रिक अभियंत्यांना पत्र लिहून ब्रेक फेल झाल्यासंबंधी माहिती दिली होती. मात्र अधिकारी असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचा दावा करत आहेत. 

गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघातांची मालिका झाली असतानाही रेल्वे मात्र कोणताही धडा शिकायला तयार नसल्याचं दिसत आहे. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशात रेल्वे अपघात होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवायदेखील अनेक अपघात झाले होते. त्यातच मंगळवारी 2000 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत असलेली दरभंगा एक्स्प्रेस ब्रेक फेल झाले असतानाही 350 किमीपर्यंत पळवण्यात आली. 

13 सप्टेंबर रोजी रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी मुख्य यांत्रिक अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात, मुंबईकडे जाणा-या दरभंगा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसच्या ब्रेकमध्ये पॉवर नसल्याचा उल्लेख केला होता. हे अत्यंत गंभीर असून, मोठी दुर्घटना होऊ शकते असंही पत्रातून सांगण्यात आलं होतं. 

उत्तर केंद्रीय रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांचं म्हणणं आहे की, 'रेल्वे बोर्डाकडून आलेल्या कोणत्याही पत्राबद्दल मला कल्पना नाही. माझ्या माहितीनुसार, जेव्हा एक्स्प्रेस दरभंगाहून रवाना झाली असेल तेव्हा रस्त्यात ब्रेक फेल झाले असावेत. जेव्हा या बिघाडाची माहिती मिळाली तेव्हा सोनपूर स्थानकावर तांत्रिक विभागाने तपास केला. मात्र त्यावेळी काहीच बिघाड नसल्याचं लक्षात आलं. ट्रेनमध्ये काही बिघाड आहे का, हे पाहण्यासाठी त्यांच्यातील एकाने छपरापर्यंत प्रवासही केला. ब्रेकमध्ये पॉवर कमी असल्याचं लक्षात आलं तेव्हा छपरा स्थानकावर पुन्हा पाहणी करण्यात आली'.

राजेश कुमार यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'बिघाड अत्यंत साधा असल्याने टेक्निकल एक्स्पर्टने दुरुस्ती केली. वाराणसीत पुन्हा तपासणी करण्यात आली. जेव्हा टेक्निकल एक्सपर्टची खात्री पडली तेव्हा ट्रेन रवाना करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही याची काळजी घेतली गेली होती. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात असून, कारणांचाही शोध घेतला जात आहे'.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी