शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

दंतेवाडा जिल्ह्यात १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; तीन जणांवर होते एक-एक लाखाचे बक्षीस

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 09:23 IST

नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी अभियान सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (naxals surrender in dantewada) केले, अशी माहिती पोलिसांकडून यावेळी देण्यात आली.

ठळक मुद्देदंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणनक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांचे अभियानगेल्या ८ महिन्यात ३१० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर बुधवारी आत्मसमर्पण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १३ जणांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून, तीन जणांवर एक-एक लाख रुपयांचे बक्षीस होते. (Dantewada Police says 13 Naxals surrendered as part of Lon Varratu campaign) 

दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी अभियान सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (naxals surrender in dantewada) केले. यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. 

गेल्या काही महिन्यांत नक्षलवादी उल्लेखनीय संख्येत समाजाच्या मुख्य प्रवाहात परतताना दिसत आहेत. समर्पण करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी तिघांवर एक-एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या सर्वांवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणे, अशा प्रकारचे गुन्हे आहेत. 

गॅस सिलिंडर ठरतात धोकादायक; वापर करताना कशी घ्याल खबरदारी?

३१० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरकारी धोरणानुसार, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलिसांकडून विविध ठिकाणी 'लोन वर्राटू' अभियानासंदर्भातील पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर देण्यात आले आहेत. यामुळे नक्षलवादी आत्मसमर्पण करण्यासाठी संपर्क साधू शकतील. लोन वर्राटू याचा स्थानिक गोंडी भाषेतील अर्थ 'आपल्या गावी परत या' असा होतो. 

गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोन वर्राटू नामक अभियान सुरू करण्यात आले आहे. हिंसाचार आणि शस्त्रास्त्र सोडून आपल्या गावी परत येण्याचे आवाहन पोलिसांकडून नक्षलवाद्यांना करण्यात आले आहे, असेही पल्लव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस