शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दंतेवाडा जिल्ह्यात १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; तीन जणांवर होते एक-एक लाखाचे बक्षीस

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 09:23 IST

नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी अभियान सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (naxals surrender in dantewada) केले, अशी माहिती पोलिसांकडून यावेळी देण्यात आली.

ठळक मुद्देदंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणनक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांचे अभियानगेल्या ८ महिन्यात ३१० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर बुधवारी आत्मसमर्पण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १३ जणांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून, तीन जणांवर एक-एक लाख रुपयांचे बक्षीस होते. (Dantewada Police says 13 Naxals surrendered as part of Lon Varratu campaign) 

दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी अभियान सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (naxals surrender in dantewada) केले. यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. 

गेल्या काही महिन्यांत नक्षलवादी उल्लेखनीय संख्येत समाजाच्या मुख्य प्रवाहात परतताना दिसत आहेत. समर्पण करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी तिघांवर एक-एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या सर्वांवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणे, अशा प्रकारचे गुन्हे आहेत. 

गॅस सिलिंडर ठरतात धोकादायक; वापर करताना कशी घ्याल खबरदारी?

३१० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरकारी धोरणानुसार, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलिसांकडून विविध ठिकाणी 'लोन वर्राटू' अभियानासंदर्भातील पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर देण्यात आले आहेत. यामुळे नक्षलवादी आत्मसमर्पण करण्यासाठी संपर्क साधू शकतील. लोन वर्राटू याचा स्थानिक गोंडी भाषेतील अर्थ 'आपल्या गावी परत या' असा होतो. 

गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोन वर्राटू नामक अभियान सुरू करण्यात आले आहे. हिंसाचार आणि शस्त्रास्त्र सोडून आपल्या गावी परत येण्याचे आवाहन पोलिसांकडून नक्षलवाद्यांना करण्यात आले आहे, असेही पल्लव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस