शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शाहीनबागच्या मध्यस्थांपुढे आंदोलकांचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 05:48 IST

मध्यस्थांपुढे अश्रुंना वाट मोकळी; सरकारने गैरसमज पसरविल्याची खंत

नवी दिल्ली : ‘सरकारने आम्हालाच दोषी ठरवून देशद्रोही म्हणून संबोधले. त्यामुळे आम्ही संतप्त नाही, तर दुखावलो आहे,’ या शब्दांत शाहीनबागमधील आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थ समितीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अश्रुंनाही वाट मोकळी करून दिली. पहिल्या दिवशीच्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने मध्यस्थ पुन्हा गुरुवारी चर्चा करणार आहेत.

दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून प्रथमच त्यांच्याशी चर्चा सुरू झाली. हा तिढा सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ अ‍ॅड. संजय हेगडे व अ‍ॅड. साधना रामचंद्रन यांना नेमले आहे. आंदोलकांनी त्यांचे टाळ््यांनी स्वागत केले. आमच्याशी बोलायला कुणी तरी आले आहे. एवढे दिवस आंदोलन करतोय, पण सरकारने आमचे ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही. आंदोलनाची जागा बदलली तर सरकार आमचे ऐकणार आहे का?, असा सवाल आंदोलकांनी केला. आम्ही सरकारशी चर्चा करू इच्छितो, असे ते म्हणाले. आतापर्यंत दोन लोकांना आम्ही बंदुकीसह पकडून पोलिसांना सोपवले आणि त्पोलिसांनी त्यांना मोकळे सोडले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आंदोलन करणे तुमचा अधिकार आहे, पण इतरांचेही मुलभूत अधिकार आहेत. आपले अधिकार वापरताना दुसऱ्यांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर काय उपयोग?,’ असा सवाल अ‍ॅड. साधना रामचंद्रन यांनी त्यांना केला.‘येथून जाणार नाही’‘एनआरसी व सीएए रद्द केल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही. गोळ््या झाडल्या तरी इथून जाणार नाही. आम्ही ब्रिटिशांना देशातून बाहेर काढले, तर नरेंद्र मोदी व अमित शहा कोण आहेत?, असे आंदोलक दादी’ म्हणाली. इथे जीव धोक्यात घालून आंदोलन करण्यात आम्हाला आनंद आहे का?,’ असा सवाल एका महिलेने केला. 

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन