शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 15:13 IST

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे रविवारी (30 डिसेंबर) निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले.

ठळक मुद्देदादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे रविवारी (30 डिसेंबर) निधन झाले आहे. मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले. 1955 मध्ये 'रात भोर' या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मृणाल यांनी बांगला भाषेतील चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केली. 

नवी दिल्ली - दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे रविवारी (30 डिसेंबर) निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले. 14 मे 1923 रोजी फरीदपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1955 मध्ये 'रातभोर' या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मृणाल यांनी बांगला भाषेतील चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केली. 

1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नील आकाशेर नीचे' या चित्रपटामुळे मृणाल सेन यांची ओळख निर्माण झाली. 'बाइशे श्रावण' या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट ‘मृगया’चे दिग्दर्शन ही त्यांनी केले होते. मृणाल सेन यांना 20 राष्ट्रीय आणि 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

2002 साली वयाच्या 80 व्या वर्षी  मृणाल यांनी ‘आमार भुवन’ या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सत्तर-ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. 2005 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मृणाल सेन यांच्या निधनावर राजकीय, सांस्कृतिक जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :cinemaसिनेमा