शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

धक्कादायक! आदिवासी युवकाला MP मध्ये तालिबानी शिक्षा; पिकअपमागे बांधून ओढत नेलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 20:16 IST

ही घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली

नीमच – मध्य प्रदेशातील नीमच इथं माणुसकीला काळीमा फासणारी भयनाक घटना घडली आहे. याठिकाणी एका गरीब आदिवासी युवकाला काही टवाळखोरांनी उघडपणे पिकअप वाहनाच्या मागे बांधून ओढण्यात आणलं. या घटनेत ८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील ४ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत ज्यात मुख्य आरोपीचाही समावेश आहे. पोलीस इतर चौघांचा शोध घेत आहे.

ही घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली. त्यानंतर आदिवासी युवक भैया लाल भील याला बांधून ओढत मारहाण केली. या घटनेनंतर युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २६ ऑगस्टला ही निर्दयी घटना घडल्याचं सांगितले जात आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

नीमच घटनेबाबत एसपी सूरज कुमार वर्मा यांनी माहिती दिली की, या घडलेल्या घटनेनंतर ८ जणांना आरोपी बनवण्यात आले आहेत. ज्यात प्रमुख आरोपी छीतरमल गुर्जर, महेंद्र गुर्जर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिकअप गाडी चालक आणि सहचालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून बाकी आरोपींनाही लवकरात लवकर पकडलं जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

काँग्रेसनं साधला निशाणा

 मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेबाबत ट्विट करत म्हटलंय की, मध्य प्रदेशात हे काय चाललंय? नीमच जिल्ह्यात आदिवासी युवकाला बेदम मारहाण केली जाते. चोरीच्या संशयावरुन त्याला इतकं निर्दयी मारहाण करून एका वाहनाच्या सहाय्याने ओढत नेलं जातं. त्यात या युवकाचा मृत्यू होतो. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून यामुळे राज्यात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. लोकं बिनधास्तपणे कायदा हातात घेत आहेत. कायद्याची भीती उरली नाही. सरकार नावाची गोष्टही दिसून येत नाही. अशा घटनांना तात्काळ रोखलं पाहिजे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावा अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस