शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘मिचाँग’नं घेतले १२ बळी, चेन्नई, आंध्रात थैमान; रेल्वे, विमान वाहतुकीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:04 IST

वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगण्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला.

अमरावती : ‘मिचाँग’  चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी १२.३० ते २.३० च्या दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडली असली तरी या वादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडूतील चेन्नई आणि जवळील परिसराला बसला. वादळामुळे १०० पेक्षा अधिक ट्रेन, १०० पेक्षा अधिक विमाने रद्द करण्यात आली असून, चेन्नईत पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.    

वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगण्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला. किनारपट्टीसह अनेक भागांत पावसाने थैमान घातले. रस्ते वाहून गेले, पूरस्थिती निर्माण होऊन हजारो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

२०० टेबल-टेनिसपटू अडकलेविजयवाडा येथे आपले पहिले ११ वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन विजेतेपद पटकावणे बंगालची युवा टेबल-टेनिसपटू श्रीओश्री चक्रवर्ती हिच्यासाठी आनंदासोबत दु:खही घेऊन आले. कारण वादळामुळे तेथे अडकून पडलेल्या या खेळाशी संबंधित ३०० लोकांत तिचाही समावेश आहे. तुफान पाऊस झाल्याने ही सगळी मंडळी विजयवाड्यात अडकून पडली आहेत.

५००० कोटींची मदत द्या.वादळाने झालेल्या विनाशाच्या पार्श्वभूमीवर, डीएमके सरकारने ५००० कोटी रुपयांच्या अंतरिम मदतीची विनंती केली आहे, असे राज्यसभा खासदार तिरुची सिवा यांनी मंगळवारी सांगितले. 

बेघर लोकांसाठी अनकापल्ली जिल्ह्यात ५२ पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, तेथे ६० हजारांहून अधिक लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार लाख टन धान्य भिजू नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलली. एलुरू जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली

एनडीआरएफची २९ पथके तैनातचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा व पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण २९ पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चेन्नई शहर व आसपासच्या जलमय भागांत अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी बोटी आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. पावसामुळे जखमी झालेल्या अन्य ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळChennaiचेन्नईRainपाऊसfloodपूर