शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सायबर वॉर :  व्हॉट्सअॅप आणि फेक लिंकमधून तरुणांना टार्गेट करतोय पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:52 IST

भारतात कारवाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यात पटाईट असलेल्या पाकिस्तानने आता सायबर हल्ले करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

तिरुवनंतपूरम - भारतात कारवाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यात पटाईट असलेल्या पाकिस्तानने आता सायबर हल्ले करण्याचा मार्ग अवलंबला आहे. पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी आता व्हॉट्स्अॅप आणि लिंकच्या माध्यमातून भारतीय तरुणांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नागरिकांचा पर्सनल डेटा चोरण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात येत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार +92 या आकड्याने सुरू होणाऱ्या पाकिस्तानी क्रमांकावरून फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. केरळमध्ये विशेषकरून मल्याळम भाषा बोलणाऱ्या युझर्सना अशा प्रकारचे फेक मेसेज मिळत आहेत. तसेच अनेक वेबसाइट्सवर शेकडोंच्या संख्येने लिंक पडल्या आहेत. कुठलाही युझर्स जेव्हा या लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो आपोआप कुठल्यातर व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडला जातो.  या व्हॉट्सअॅप ग्रुपची नावे इंटरकनेक्टेड, आय लव्ह माय पाकिस्तान, पाकिस्तान झिंदाबाद अशी आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे सुमारे 60 ते 70 ग्रुप आहे. या ग्रुपचे अॅडमिन पाकिस्तानमधील इस्लामाबाद, मुल्तान आदी शहरांमधून सूत्रे हलवत आहेत. या हॅकर्सकडून केरळमधील लोकांना विशेषकरून तरुणांना टार्गेट केले जात आहे. केरळमधील आयटी एक्सपर्ट्सनी यासंदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPakistanपाकिस्तानIndiaभारतWhatsAppव्हॉट्सअॅप