शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु, डिसेंबरमध्ये होणार अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 14:59 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकारिणी समितीने आज एक ठराव मंजूर केला असून अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केलीकाँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सूचना जारी करण्यात येईल5 डिसेंबरला राहुल गांधी वगळता इतर कोणताही अर्ज न झाल्यास ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात येईल

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींसोबत वरिष्ठ नेते हजर होते. काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सूचना जारी करण्यात येईल. 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मदत असणार आहे. अर्जांची छाननी करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला राहुल गांधी वगळता इतर कोणताही अर्ज न झाल्यास ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात येईल. 

राहुल गांधी सध्या काँग्रेस उपाध्यक्ष असून, अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताच जास्त आहे. जाहीर करण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून 5 डिसेंबरपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे, तर 16 डिसेंबरला गरज पडल्यास मतदान घेण्यात येईल. पण सध्या तरी या स्पर्धेत राहुल गांधी एकमेव आहेत. 

 

सोनिया गांधींच्या निवासस्थानी 10 जनपथवर काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली. अंतर्गत निवडणुका पुर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाला वर्षाअखेपर्यंतची मुदत दिली आहे. 

 

आई किंवा मुलगा या दोघांचीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊ शकते - मणिशंकर अय्यरयाआधी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पक्षाध्यक्षपदाच्या नेमणुकीसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण जाला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदी फक्त दोन व्यक्तींची निवड होऊ शकते, आई किंवा मुलगा असे खळबळजनक विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच सोनिया गांधींकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार आहेत या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मणिशंकर अय्यर यांनी हे धक्कादायक विधान केले होते. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची गरज असते. फक्त एकच उमेदवार असेल तर, निवडणूक कशी होणार ? असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी विचारला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस