शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 09:27 IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनाबद्दल काँग्रेसने शोकसभा बोलावली नसल्याचा दावा त्यांनी केला.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वेगळ्या स्मारकाचा ठेवलेल्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केला, डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक्सवर दिलेल्या निवेदनात असा दावा केला आहे की, ऑगस्ट २०२० मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी CWC ची शोकसभा बोलावण्याची तसदी घेतली नाही. या मुद्द्यावरून काँग्रेस नेतृत्वाने आपली दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

अवघा देश स्तब्ध; डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार

'काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना सांगितले होते की, भारतीय राष्ट्रपतींसाठी असे होत नाही. या दाव्याला बकवास असल्याचे सांगत शर्मिष्ठा यांनी दावा केला की, वडिलांच्या डायरीतून समजले की माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या निधनावर CWC ची बैठक बोलावण्यात आली होती आणि शोकसंदेश स्वतः प्रणव मुखर्जी यांनी लिहिला होता. शर्मिष्ठा सी.आर. केशवन यांच्या पोस्टचाही हवाला देण्यात आला होता, ज्यात गांधी घराण्यातील नसलेल्या नेत्यांकडे काँग्रेसने कसे दुर्लक्ष केले हे सांगितले होते.

या संदर्भात मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार आणि 'द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चे लेखक डॉ. संजय बारू यांच्या पुस्तकातील एका प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला होता, यामध्ये काँग्रेसने माजी पंतप्रधानांना कसा न्याय दिला हे सांगण्यात आले होते. मंत्री पी.व्ही. नरसिंह राव यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्यांच्यासाठी दिल्लीत कोणतेही स्मारक बांधले गेले नाही. २००४ ते २०१४ पर्यंत सत्तेत असूनही काँग्रेसने राव यांचे स्मारक बांधले नाही, असेही या पुस्तकात लिहिले आहे. राव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत नव्हे तर त्यांच्या मूळ गावी हैदराबादमध्ये व्हावेत, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचा दावाही बारू यांनी केला होता.

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारकाची मागणी केली. तेव्हा हा संपूर्ण वाद सुरू झाला. यावर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नाराजी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती असलेल्या त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल काँग्रेसने सीडब्ल्यूसीची शोकसभाही कशी बोलावली नाही याची आठवण त्यांनी सांगितली.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे