शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कट? दिल्लीतील प्राध्यापकाच्या आरोपाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 6:42 AM

Education, politics News: प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठामध्ये डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एक सुनियोजित कट आखण्यात आला आहे. त्यानुसार केरळशिक्षण मंडळ आपल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण देते. मग हे विद्यार्थी दिल्ली विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयांत प्रवेश घेऊन डाव्या विचारांचा प्रसार करतात, असा आरोप दिल्लीतील किरोडीमल कॉलेजचे प्राध्यापक राकेश पांडे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला आहे. राकेश पांडे म्हणाले की, डाव्या विचारांच्या लोकांचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता दिल्ली विद्यापीठाकडे मोर्चा वळविला. डावी विचारसरणी दुसऱ्यावर लादण्यासाठी केरळमधील शिक्षण मंडळामार्फत एक कट आखण्यात आला. त्याद्वारे केरळमधील विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण देऊन त्यांना दिल्लीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला जात आहे. तिथे डाव्या विचारांचा केरळी विद्यार्थी प्रचार करतात असे आढळून आले आहे. राकेश पांडे यांनी मांडलेल्या मतांना विरोध करताना अरबिंदो कॉलेजचे प्राध्यापक आदित्य नारायण मिश्रा यांनी सांगितले की, दिल्ली विद्यापीठ एक केंद्रीय विद्यापीठ आहे. तिथे देशातील कोणत्याही भागातले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळतात, त्यांना प्रवेश कसा काय नाकारणार, राकेश पांडे यांनी केलेल्या विधानांमुळे दिल्ली विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. 

एएसयूआयचा विरोध, अभाविपचा पाठिंबा- काँग्रेसची विद्यार्थी संघटना एसएसयूआयने राकेश पांडे यांच्याविरोधात निदर्शने केली, तर अभाविपने पांडे यांना समर्थन दिले आहे. - दिल्ली विद्यापीठाच्या पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये सर्वांत जास्त प्रवेश सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळाला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केरळ बोर्डाचे विद्यार्थी आहेत. - सीबीएसई बोर्डाचे ३११७२, केरळ शिक्षण मंडळाचे २३६५, हरियाणा शिक्षण मंडळाचे १५४०, राजस्थान बोर्डाच्या १३०१ विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणKeralaकेरळdelhiदिल्ली