शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कट? दिल्लीतील प्राध्यापकाच्या आरोपाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 06:43 IST

Education, politics News: प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठामध्ये डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एक सुनियोजित कट आखण्यात आला आहे. त्यानुसार केरळशिक्षण मंडळ आपल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण देते. मग हे विद्यार्थी दिल्ली विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयांत प्रवेश घेऊन डाव्या विचारांचा प्रसार करतात, असा आरोप दिल्लीतील किरोडीमल कॉलेजचे प्राध्यापक राकेश पांडे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला आहे. राकेश पांडे म्हणाले की, डाव्या विचारांच्या लोकांचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता दिल्ली विद्यापीठाकडे मोर्चा वळविला. डावी विचारसरणी दुसऱ्यावर लादण्यासाठी केरळमधील शिक्षण मंडळामार्फत एक कट आखण्यात आला. त्याद्वारे केरळमधील विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण देऊन त्यांना दिल्लीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला जात आहे. तिथे डाव्या विचारांचा केरळी विद्यार्थी प्रचार करतात असे आढळून आले आहे. राकेश पांडे यांनी मांडलेल्या मतांना विरोध करताना अरबिंदो कॉलेजचे प्राध्यापक आदित्य नारायण मिश्रा यांनी सांगितले की, दिल्ली विद्यापीठ एक केंद्रीय विद्यापीठ आहे. तिथे देशातील कोणत्याही भागातले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळतात, त्यांना प्रवेश कसा काय नाकारणार, राकेश पांडे यांनी केलेल्या विधानांमुळे दिल्ली विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. 

एएसयूआयचा विरोध, अभाविपचा पाठिंबा- काँग्रेसची विद्यार्थी संघटना एसएसयूआयने राकेश पांडे यांच्याविरोधात निदर्शने केली, तर अभाविपने पांडे यांना समर्थन दिले आहे. - दिल्ली विद्यापीठाच्या पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये सर्वांत जास्त प्रवेश सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळाला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केरळ बोर्डाचे विद्यार्थी आहेत. - सीबीएसई बोर्डाचे ३११७२, केरळ शिक्षण मंडळाचे २३६५, हरियाणा शिक्षण मंडळाचे १५४०, राजस्थान बोर्डाच्या १३०१ विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणKeralaकेरळdelhiदिल्ली