शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

देशभरात ४८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू; यंदा ३० लाख टन साखरेचे जादा उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 00:52 IST

यंदा ३० लाख टन साखरेचे जादा उत्पादन

नवी दिल्ली : सरत्या वर्षाच्या अखेरीस देशातील ४८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. २०१९ च्या डिसेंबरमध्ये ४३९ कारखाने सुरू होते. यंदा त्यात वाढ झाल्याने २०२० पेक्षा नववर्षात ३० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

आजपर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ते गतवर्षी आजच्या दिवसापर्यंतच्या तुलनेत ३६१ लाख टन जास्त आहे. सरासरी साखर उतारा ९.४३ टक्के असला तरी १०८ टन साखर जास्त झाली आहे. उत्तर प्रदेशात उसाचे गाळप ३३१ लाख टन झाले. कर्नाटकातील ६५ कारखान्यांमधून २६१ लाख टनाचे गाळप झाले असून त्यातून सरासरी ८.९५ टक्के उताऱ्याने २३.४० लाख टन जास्त साखर झाली आहे. त्यापाठोपाठ गुजरात, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश ,पंजाब, तामिळनाडू , उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा क्रमांक येतो.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यावर म्हटले आहे की, इथेनॉलचे वाढीव दर, तेल कंपन्यांकडून खरेदीची हमी तसेच पुरवठा तारखेपासून २१ दिवसांत पूर्ण पैसे देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. सरकारच्या बदलेल्या धोरणामुळे साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याची भूमिका घ्यावी. साखर निर्यात करून शिल्लक साठे, त्यात अडकलेली रक्कम व त्यावर चढणाऱ्या व्याजाच्या बोझ्यापासून सुटका करून घ्यावी. कारण, साखर निर्यात योजना हळूहळू कमी होणार असून २०२२-२३ नंतर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार बंद होईल. 

गाळपामध्ये व साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून गतवर्षीच्या १६५ लाख टनाच्या तुलनेत डिसेंबर २०२० अखेर ४२१ टनाचे गाळप झाले असून त्यातून ४० लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले. मात्र, महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा २०१९ साली १० टक्के होता तो डिसेंबर २०२० मध्ये अर्ध्या टक्क्याने घटला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेIndiaभारत