शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशभरात ४८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू; यंदा ३० लाख टन साखरेचे जादा उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 00:52 IST

यंदा ३० लाख टन साखरेचे जादा उत्पादन

नवी दिल्ली : सरत्या वर्षाच्या अखेरीस देशातील ४८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. २०१९ च्या डिसेंबरमध्ये ४३९ कारखाने सुरू होते. यंदा त्यात वाढ झाल्याने २०२० पेक्षा नववर्षात ३० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

आजपर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ते गतवर्षी आजच्या दिवसापर्यंतच्या तुलनेत ३६१ लाख टन जास्त आहे. सरासरी साखर उतारा ९.४३ टक्के असला तरी १०८ टन साखर जास्त झाली आहे. उत्तर प्रदेशात उसाचे गाळप ३३१ लाख टन झाले. कर्नाटकातील ६५ कारखान्यांमधून २६१ लाख टनाचे गाळप झाले असून त्यातून सरासरी ८.९५ टक्के उताऱ्याने २३.४० लाख टन जास्त साखर झाली आहे. त्यापाठोपाठ गुजरात, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश ,पंजाब, तामिळनाडू , उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा क्रमांक येतो.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यावर म्हटले आहे की, इथेनॉलचे वाढीव दर, तेल कंपन्यांकडून खरेदीची हमी तसेच पुरवठा तारखेपासून २१ दिवसांत पूर्ण पैसे देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. सरकारच्या बदलेल्या धोरणामुळे साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याची भूमिका घ्यावी. साखर निर्यात करून शिल्लक साठे, त्यात अडकलेली रक्कम व त्यावर चढणाऱ्या व्याजाच्या बोझ्यापासून सुटका करून घ्यावी. कारण, साखर निर्यात योजना हळूहळू कमी होणार असून २०२२-२३ नंतर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार बंद होईल. 

गाळपामध्ये व साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून गतवर्षीच्या १६५ लाख टनाच्या तुलनेत डिसेंबर २०२० अखेर ४२१ टनाचे गाळप झाले असून त्यातून ४० लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले. मात्र, महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा २०१९ साली १० टक्के होता तो डिसेंबर २०२० मध्ये अर्ध्या टक्क्याने घटला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेIndiaभारत