शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

देशभरात ४८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू; यंदा ३० लाख टन साखरेचे जादा उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 00:52 IST

यंदा ३० लाख टन साखरेचे जादा उत्पादन

नवी दिल्ली : सरत्या वर्षाच्या अखेरीस देशातील ४८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. २०१९ च्या डिसेंबरमध्ये ४३९ कारखाने सुरू होते. यंदा त्यात वाढ झाल्याने २०२० पेक्षा नववर्षात ३० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

आजपर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ते गतवर्षी आजच्या दिवसापर्यंतच्या तुलनेत ३६१ लाख टन जास्त आहे. सरासरी साखर उतारा ९.४३ टक्के असला तरी १०८ टन साखर जास्त झाली आहे. उत्तर प्रदेशात उसाचे गाळप ३३१ लाख टन झाले. कर्नाटकातील ६५ कारखान्यांमधून २६१ लाख टनाचे गाळप झाले असून त्यातून सरासरी ८.९५ टक्के उताऱ्याने २३.४० लाख टन जास्त साखर झाली आहे. त्यापाठोपाठ गुजरात, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश ,पंजाब, तामिळनाडू , उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा क्रमांक येतो.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यावर म्हटले आहे की, इथेनॉलचे वाढीव दर, तेल कंपन्यांकडून खरेदीची हमी तसेच पुरवठा तारखेपासून २१ दिवसांत पूर्ण पैसे देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. सरकारच्या बदलेल्या धोरणामुळे साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याची भूमिका घ्यावी. साखर निर्यात करून शिल्लक साठे, त्यात अडकलेली रक्कम व त्यावर चढणाऱ्या व्याजाच्या बोझ्यापासून सुटका करून घ्यावी. कारण, साखर निर्यात योजना हळूहळू कमी होणार असून २०२२-२३ नंतर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार बंद होईल. 

गाळपामध्ये व साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून गतवर्षीच्या १६५ लाख टनाच्या तुलनेत डिसेंबर २०२० अखेर ४२१ टनाचे गाळप झाले असून त्यातून ४० लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले. मात्र, महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा २०१९ साली १० टक्के होता तो डिसेंबर २०२० मध्ये अर्ध्या टक्क्याने घटला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेIndiaभारत