शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसी स्टेशनवर गर्दीच गर्दी! महाकुंभ स्पेशल ट्रेनच्या इंजिनमध्येही लोक बसली; RPF ने कारवाई केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:49 IST

वाराणसी कॅन्ट स्टेशनवर महाकुंभ स्पेशल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांनी रेल्वे इंजिन ताब्यात घेतले. लोको पायलट केबिनपर्यंत पोहोचू शकला नाही, त्यामुळे आरपीएफला हस्तक्षेप करावा लागला.

गेल्या काही दिवसापासून महाकुंभ सुरू आहे. महाकुंभमध्ये जगभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत. प्रशासनाने स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत, आज वाराणसी स्टेशनवर भाविकांचा मोठी गर्दी झाली होती. वाराणसी स्टेशनवर एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. प्रवाशांनी महाकुंभ स्पेशल ट्रेनचे इंजिन ताब्यात घेतल्याचे आज पाहायला मिळाले. मागील सगळ्याच डब्यात गर्दी झाल्यामुळे प्रवासी इंजिनच्या डब्यात बसले होते. 

"त्यांचा नाश निश्चित आहे..."; कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दुर्योधनशी केली

शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास, प्रयागराजला जाणारी महाकुंभ विशेष ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वर उभी होती. ट्रेनमध्ये आधीच खूप गर्दी होती, पण प्रवाशांना जागा मिळाली नाही तेव्हा काही जण ट्रेनच्या इंजिनमध्ये चढले. तेव्हा ट्रेनच्या लोको पायलटने त्यांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रवाशांनी दरवाजा उघडण्यासही नकार दिला.

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेल्वे संरक्षण दलाला पाचारण केले. सैनिकांनी प्रवाशांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी कमी झाली नाही. शेवटी, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि प्रवाशांना एक-एक करून इंजिनमधून खाली उतरवण्यात आले. यावेळी काही प्रवाशांनी विरोधही केला, परंतु सुरक्षा दलांनी कडकपणा दाखवत इंजिन रिकामे केले. यानंतर लोको पायलटने रेल्वे इंजिनचा ताबा घेतला. 

महाकुंभाचे तीन शाही स्नान संपले आहेत, पण भाविकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. रेल्वे स्थानकांवर गोंधळ आहे, यामुळे गाड्यांचे कामकाज विस्कळीत होत आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि प्रवास सुरक्षित आणि व्यवस्थित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजसाठी सतत अतिरिक्त गाड्या चालवल्या जात आहेत, पण गर्दी  जास्त असल्यामुळे परिस्थिती हाताळणे कठीण होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आणि सुरक्षा दल सतत काम करत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वे