शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राजस्थानात ९० हजार हेक्टरवरील पिके टोळधाडीत नष्ट; २६ वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 06:34 IST

आफ्रिकेत ५ महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे पूरक वातावरण तयार होऊन टोळांची उत्पत्ती

जयपूर : पाकिस्तानी सीमेतून राजस्थानात शिरलेल्या वाळवंटी टोळांनी राज्यातील २० जिल्ह्यांतील ९० हजार हेक्टरवरील पिके फस्त केली आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थानातही टोळधाडीचा धुमाकूळ सुरू असून, हरयाणात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. ही २६ वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड आहे.

एका वरिष्ठ अधिकाºयाने गुरुवारी सांगितले की, टोळ नियंत्रण पथकांनी कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर टोळधाड श्रीगंगानगरमधून नागौर, जयपूर, दौसा, करौली आणि सवाई माधोपूर या मार्गाने उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात घुसली.

कृषी आयुक्त ओम प्रकाश यांनी सांगितले की, श्रीगंगानगर जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नागौरमध्ये १०० हेक्टरील पिके टोळांनी फस्त केली. राज्यातील २० जिल्ह्यांतील ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ६७ हजार हेक्टरवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. ब्रिटिश निर्मित ८०० फवारणी यंत्रांच्या ट्रॅक्टरांद्वारे ही फवारणी करण्यात आली. या कामी २०० पथके लावण्यात आली. १२० जीप उपलब्ध करून देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कीटकनाशके मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

टोळधाड ताशी १५ ते २० कि.मी. वेगाने प्रवास करून एका दिवसात १५० कि.मी.चे अंतर पार करते. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले आहेत.

हवामान बदलाचा परिणाम

च्लखनौ : हवामान बदलामुळे यंदा विनाशकारी टोळधाड आल्याचा दावा पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. ही अडीच दशकांमधील सर्वांत मोठी आणि विनाशकारी टोळधाड असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.‘क्लायमेट ट्रेंडस्’च्या मुख्य प्रशासकीय अधिकारी आरती खोसला यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पाच महिन्यांपूर्वी पूर्व आफ्रिकेत प्रचंड पाऊस पडला होता. त्यामुळे उपयुक्त वातावरण निर्माण होऊन टोळांचे थवे विकसित झाले.

आरती खोसला यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची खाद्य संघटना ‘एफएओ’नुसार जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर टोळधाडीचा हल्ला तीव्र होईल. भारतीय शेतकºयांना टोळधाडीच्या संकटाचा सामना करावा लागेल.

महाराष्ट्रासह 05 राज्यांत टोळधाड

मध्यप्रदेशातील मालवा भागात टोळधाड आल्या आहेत. च्महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश या पाच राज्यातील शेतकºयांना टोळधाडीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तथापि, कृषि मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या राज्यांमध्ये टोळ नियंत्रण अभियान सुरु करण्यात येत आहे.

राजस्थानातील बारमेर, जोधपूर, नागौर, गंगानगर, हनुमानगड, जयपूर जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशातील सतना, ग्वाल्हेर, राजगड, बैतुल, देवास, आगर मालवा जिल्ह्यात टोळ सक्रीय आहेत. महाराष्ट्रात काही भागात किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. नागपूर, भंडारा या भागात टोळधाड आगेकूच करत असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. राज्याच्या कृषि विभागाने विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांसाठी याचा इशारा जारी केला आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानMaharashtraमहाराष्ट्र