शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

पीक, महागाई...! यंदाचा पाऊस थांबता थांबणार नाही; हवामान देतेय विचित्र संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 20:25 IST

हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे.

यंदा ऑगस्ट संपत आला तरी अनेक भागात रिमझिम नाही तर मुसळधार पाऊस पडत आहे. आधी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये पुराचा कहर केल्यानंतर आता गुजरात, राजस्थानमध्ये पावसाने हाहाकार माजविलेला आहे. काही केल्या हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच आता पाऊस सप्टेंबर नाही तर पार ऑक्टोबरपर्यंत पडतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. मान्सून परतण्यास सप्टेंबर अखेर किंवा त्यापेक्षाही पुढे सुरुवात होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका, डाळी आदीचे उत्पादन सप्टेंबरअखेर घेतले जाते. यामुळे जर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. 

पुढील पीक थंडीत पेरले गेले तर त्याचा फायदा पिकाला होणार आहे. कारण जमिनीमध्ये ओलावा राहणार असून गहू, चण्यासारख्या पिकाला याचा फायदा होणार आहे. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ संशोधकाने रॉयटरला याची माहिती दिली आहे. 

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनमध्ये पाऊस सुरु होऊन तो १७ सप्टेंबरपर्यंत संपतो. परंतू यंदा तो ऑक्टोबर मध्य गाठणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गहू, साखर आणि तांदूळ उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या हवामानामुळे शेतमालाच्या निर्यातीत अडचणी येणार आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशात सात टक्के अधिक पाऊस होता. काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा सरासरीपेक्षा 66 टक्के जास्तीचा पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस झाल्यास पिकांवर परिणाम होऊन खाद्यपदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस