शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
2
सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना
3
VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं
4
अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?
5
"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
6
महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
7
Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
8
केंद्र सरकारचा 'X' ला शेवटचा इशारा! 'Grok AI' मधील अश्लील मजकूर हटवण्यासाठी दिली डेडलाइन
9
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
10
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
11
Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
12
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
13
भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
14
एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
16
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
17
युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी
18
साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
19
बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
20
काहीही केलं तरी वजन कमीच होईना... 'रताळं' ठरेल सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पीक, महागाई...! यंदाचा पाऊस थांबता थांबणार नाही; हवामान देतेय विचित्र संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 20:25 IST

हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे.

यंदा ऑगस्ट संपत आला तरी अनेक भागात रिमझिम नाही तर मुसळधार पाऊस पडत आहे. आधी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये पुराचा कहर केल्यानंतर आता गुजरात, राजस्थानमध्ये पावसाने हाहाकार माजविलेला आहे. काही केल्या हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच आता पाऊस सप्टेंबर नाही तर पार ऑक्टोबरपर्यंत पडतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. मान्सून परतण्यास सप्टेंबर अखेर किंवा त्यापेक्षाही पुढे सुरुवात होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका, डाळी आदीचे उत्पादन सप्टेंबरअखेर घेतले जाते. यामुळे जर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. 

पुढील पीक थंडीत पेरले गेले तर त्याचा फायदा पिकाला होणार आहे. कारण जमिनीमध्ये ओलावा राहणार असून गहू, चण्यासारख्या पिकाला याचा फायदा होणार आहे. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ संशोधकाने रॉयटरला याची माहिती दिली आहे. 

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनमध्ये पाऊस सुरु होऊन तो १७ सप्टेंबरपर्यंत संपतो. परंतू यंदा तो ऑक्टोबर मध्य गाठणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गहू, साखर आणि तांदूळ उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या हवामानामुळे शेतमालाच्या निर्यातीत अडचणी येणार आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशात सात टक्के अधिक पाऊस होता. काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा सरासरीपेक्षा 66 टक्के जास्तीचा पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस झाल्यास पिकांवर परिणाम होऊन खाद्यपदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस