शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

Crime News: २५ लाखांचं कर्ज, ७२ लाखांचा विमा क्लेम... पैशांसाठी रचला संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव, अखेर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 10:33 IST

Crime News: रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या एका कुटुंबाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, विमा पॉलिसीचे ७२ लाख रुपये मिळवण्यासाठी या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव रचला होता.

छत्तीसगडमधील कांकेर येथे रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या एका कुटुंबाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, विमा पॉलिसीचे ७२ लाख रुपये मिळवण्यासाठी या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव रचला होता.  कारण त्याच्यावर २५ लाख रुपयांचं कर्ज होतं. पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाला शोधून काढलं आहे. तसेच  आरोपीला अटक केली आहे. 

पखांजूर येथील रहिवासी समिरन सिकदार याला व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तसेच तो पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने एक डाव रचला. त्याने १ मार्च रोजी कांकेरमध्ये त्याच्या नव्या कारला आग लावली. तसेच अपघातात आपली पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी १३ दिवस कुटुंबासह बेपत्ता झाला. त्याने यादरम्यान पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. 

दरम्यान, २  मार्च रोजी त्याने आपल्या कुटुंबासह धमतरी शहरात एका लॉजमध्ये रुम घेतला. तसेच एक दिवस तिथेच राहिला. यादरम्यान, कांकेर पोलिसांना बेपत्ता झालेले चार जण लॉजमध्ये दिसल्याची खबर मिळाली.  त्यानंतर पोलिसांना सातत्याने या कुटुंबाचा शोध सुरू केला. मात्र आरोपी समीरन सिकदार त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसह पश्चिम बंगालमधून बिहारमध्ये पोहोचला. तसेच १३ दिवसांपर्यंत आपल्या मोबाईल फोनला घटनास्थळी फेकून पोलिसांची दिशाभूल करत राहिला. 

समीरन सिकदारला शोधण्यासाठी पोलिसांनी ९ लाखांहून अधिक मोबाईल नंबर आणि एक हजारांहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. जेव्हा आपण जिवंत असल्याचे समजून पोलीस शोध घेत आहेत, हे समजले तेव्हा तो घरी आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पोलिसांना सांगितले की, तो पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतो. त्याने त्याच्यावर २५ लाख रुपयाचं कर्ज असल्याने विम्याचे ७२ लाख रुपये घेण्यासाठी हा बनाव रचला होता.

एक मार्च रोजी चारामा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोरर मार्गावर एक जळालेली कार सापडली होती. कार जळाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. फॉरेंसिक तपासामद्ये कारमध्ये मानवी अवशेष सापडले नव्हते. मात्र कारमधून दोन जलालेले मोबाईल मिळाले होते. त्यामुळे पोलिसांना काहीतरी कटकारस्थान असल्याचा संशय आला होता. त्या दिशेने त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड