शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Crime News: २५ लाखांचं कर्ज, ७२ लाखांचा विमा क्लेम... पैशांसाठी रचला संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव, अखेर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 10:33 IST

Crime News: रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या एका कुटुंबाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, विमा पॉलिसीचे ७२ लाख रुपये मिळवण्यासाठी या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव रचला होता.

छत्तीसगडमधील कांकेर येथे रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या एका कुटुंबाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, विमा पॉलिसीचे ७२ लाख रुपये मिळवण्यासाठी या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव रचला होता.  कारण त्याच्यावर २५ लाख रुपयांचं कर्ज होतं. पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाला शोधून काढलं आहे. तसेच  आरोपीला अटक केली आहे. 

पखांजूर येथील रहिवासी समिरन सिकदार याला व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तसेच तो पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने एक डाव रचला. त्याने १ मार्च रोजी कांकेरमध्ये त्याच्या नव्या कारला आग लावली. तसेच अपघातात आपली पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी १३ दिवस कुटुंबासह बेपत्ता झाला. त्याने यादरम्यान पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. 

दरम्यान, २  मार्च रोजी त्याने आपल्या कुटुंबासह धमतरी शहरात एका लॉजमध्ये रुम घेतला. तसेच एक दिवस तिथेच राहिला. यादरम्यान, कांकेर पोलिसांना बेपत्ता झालेले चार जण लॉजमध्ये दिसल्याची खबर मिळाली.  त्यानंतर पोलिसांना सातत्याने या कुटुंबाचा शोध सुरू केला. मात्र आरोपी समीरन सिकदार त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसह पश्चिम बंगालमधून बिहारमध्ये पोहोचला. तसेच १३ दिवसांपर्यंत आपल्या मोबाईल फोनला घटनास्थळी फेकून पोलिसांची दिशाभूल करत राहिला. 

समीरन सिकदारला शोधण्यासाठी पोलिसांनी ९ लाखांहून अधिक मोबाईल नंबर आणि एक हजारांहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. जेव्हा आपण जिवंत असल्याचे समजून पोलीस शोध घेत आहेत, हे समजले तेव्हा तो घरी आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पोलिसांना सांगितले की, तो पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतो. त्याने त्याच्यावर २५ लाख रुपयाचं कर्ज असल्याने विम्याचे ७२ लाख रुपये घेण्यासाठी हा बनाव रचला होता.

एक मार्च रोजी चारामा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोरर मार्गावर एक जळालेली कार सापडली होती. कार जळाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. फॉरेंसिक तपासामद्ये कारमध्ये मानवी अवशेष सापडले नव्हते. मात्र कारमधून दोन जलालेले मोबाईल मिळाले होते. त्यामुळे पोलिसांना काहीतरी कटकारस्थान असल्याचा संशय आला होता. त्या दिशेने त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड