शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

माझे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे - कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:43 IST

मुख्यमंत्री कुमारस्वामींना ठाम संशय; म्हणाले, ‘मी बिलकूल डगमगणार नाही!’

बंगळुरू : माझे आघाडीचे सरकार अस्थिर करून पाडण्याच्या उचापती काही लोक करत आहेत. पण त्यामुळे मी बिलकूल डगमगणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. पुन्हा मुख्यमंत्री व्हायची माझी तयारी आहे, असे विधान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावणे सुरु झाले. आपल्या विधानाने पराचा कावळा केला जाऊ शकतो याचे भान ठेवत सिद्धरामय्या यांनी असा खुलासाही केला की, पाच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत जनतेने कौल दिला तर मुख्यमंत्री व्हायला मी तयार आहे, असे मला म्हणायचे होते.

पत्रकारांशी रविवारी बोलताना सिद्धरामय्या यांचे नाव न घेता मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, कोणीतरी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे व नव्या मुख्यमंत्र्याचा ३ सप्टेंबर रोजी शपथविधी होईल, असे भाकित भाजपावाले करीत असल्याच्या बातम्या माध्यमात पाहिल्या. नक्कीच माझे सरकार अस्थिर करण्याच्या उचापती कोणीतरी करीत आहे. पण त्यात त्यांना अजिबात यश येणार नाही. लवकरच माझे सरकार १०० दिवस पूर्ण करेल. खुर्चीची काळजी न करता मी राज्याला सुशासन देण्याचे काम सुरुच ठेवेन. सिद्धरामय्या यांचे कट्टर विरोधक व जनता दल (सेक्युलर) अध्यक्ष ए.एच. विश्वनाथ म्हैसूरमध्ये बोलताना उपरोधाने म्हणाले की, सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंद होईल. पण कोणत्या पक्षातर्फे किंवा कोणाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होणार हे त्यांनी स्पष्ट केले तर बरे होईल! (वृत्तसंस्था)भाजपाच्या आवया सुरूचबाहेरून टेकू दिलेले कुमारस्वामींचे सरकार लवकरच कोसळेल, अशा माध्यमांतून पद्धतशीर आवया उठविणे भाजपाकडून सुरू आहे. भाजपाच्या एका नेत्याने तर असा दावा केला की, कुमारस्वामी सरकारमधून आमदारांना फोडण्याचे आमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला त्यांचे किमान १७ आमदार फोडावे लागतील.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण