शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

CPEC आमच्या भूमीवर, काम त्वरित बंद करा; चीन-पाकिस्तानला भारताचा कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 09:36 IST

अशात, सीपीईसी मुद्द्यावर भारताने दिलेले हे सर्वात कठोर निवेदन आहे. भारताचा सीपीईसीला आधीपासूनच विरोध आहे. मात्र, आता भारताने चीनला काम थांविण्याचा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.

  नवी दिल्ली - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांच्यात बिजिंग येथे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आलेल्या संयुक्त निवेदनात, ज्या पद्धतीने काश्मीरचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर भारताने कडक शब्दात आक्षेप घेतला आहे. तसेच, या दोन्ही देशांनी भारतांतर्गत गोष्टींत हस्तक्षेप करणे बंद करावे, असा इशाराही भारताने दिला आहे. याच बरोबर, बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या भारतीय भूभागावर चीन-पाकिस्तानने इकोनॉमिक कॉरिडोरचे (सीपीईसी) कामही बंद करावे, असेही भारताने म्हटले आहे. (cpec on indian soil work should be stopped India's strict warning to china and pakistan said)

भारतांतर्गत गोष्टींत हस्तक्षप करणे बंद करा -यासंदर्भात विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि पुढेही राहतील. या संयुक्त निवेदनात तथाकथित चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचा (सीपीईसी) उल्लेख करण्यात आला आहे. आम्ही पाकिस्तान आणि चीनला नेहमीच सांगितले आहे, की तथाकथित सीपीईसीचे निर्माण पाकिस्तानकडून बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या भारतीय जमिनीवर करण्यात येत आहे. याला आमचा विरोध आहे आणि हे काम त्वरित बंद करा आणि भारतांतर्गत गोष्टींत हस्तक्षप करणे बंद करा, असेही म्हटले आहे.

पाकिस्तानात पोलीस आयुक्तांचं कुत्र बेपत्ता, शोधण्यासाठी अख्खं डिपार्टमेंट लावलं कामाला; जाणून घ्या किंमत

सीपीईसी मुद्यावर भारताचा चीनला पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात इशारा -अशात, सीपीईसी मुद्द्यावर भारताने दिलेले हे सर्वात कठोर निवेदन आहे. भारताचा सीपीईसीला आधीपासूनच विरोध आहे. मात्र, आता भारताने चीनला काम थांविण्याचा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.  

सीपीईसीवर बोलावण्यात आलेल्या पहिल्या बैठकीत भारताने भाग घेतला नव्हता -चीनने सीपीईसीसंदर्भात पहिली बैठक 2015 मध्ये बोलावली होती. यात भारताने भाग न घेत आपला विरोध दर्शवला होता. अनेक तज्ज्ञांच्या मते तेव्हापासूनच चीन भारतासंदर्भात आक्रमक झाला. भारताच्या विरोधानंतर फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, जपान, दक्षिण कोरिया, आस्ट्रेलिया सारख्या देशांनीही आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांच्या बाबतीत इतर देशांच्या भौगोलिक अखंडत्वाचा आदर करण्यासंदर्भात भाष्यकेले होते. 

टॅग्स :CPECसीपीईसीIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान