शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

“अन्यथा गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळवता आला नसता, देशाची प्रतिष्ठा वाढली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 16:23 IST

गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये गलवान घाटीच्या परिसरात मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

नवी दिल्ली: गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये गलवान घाटीच्या परिसरात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या रक्तरंजित संघर्षात भारताचे जवान शहीद झाले. तर, दुसरीकडे चीनलाही मोठा फटका बसला. मात्र, अद्याप चीनने तसे मान्य केलेले नाही. यासंदर्भात भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी सुरक्षेतील गुंतवणुकीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. डोकलाम आणि गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली असून, संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीमुळेच हे शक्य झाल्याचे मोहंती यांनी नमूद केले. (army vice chief cp  mohanty says if the country did not invest in security we would have probably lost the war in kargil)

“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण क्षेत्रात केंद्राने केलेल्या गुंतवणुकीबाबत मोठे विधान केले. देशाने सुरक्षेत गुंतवणूक केली नसती तर आम्ही कारगील, डोकलाममधील युद्धात पराभूत झालो असतो. जम्मू -काश्मीरमधील अंतर्गत सुरक्षा, तसेच आपला ईशान्य प्रदेश अशांत झाला असता आणि नक्षलवाद्यांना मोकळे मैदान मिळाले असते, असे मोहंती यांनी नमूद केले. 

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

डोकलाम, गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली

तिबेटमध्ये मजबूत सशस्त्र सेना असती तर त्यांच्यावर कधीही आक्रमण झाले नसते. डोकलाम आणि गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली. पण त्याचसोबतच देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दर्जा देखील दिला गेला.  प्रत्येकजण भारताकडे एक सुरक्षा प्रदाता म्हणून पाहतो. ते एका मोठ्या राष्ट्राच्या विरोधात सुरक्षा कवच आहे, असे मोहंती यांनी सांगितले. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

भारतीय सशस्त्र दल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

भारतीय सशस्त्र दल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत. कारण ते जात आणि पंथ या सर्वांवर आहेत. भारतीय सशस्त्र दलांना कोणत्याही राजकीय आकांक्षा नसतात आणि ते देशातील राजकारणाचा आदर करतात. अशी अनेक उदाहरण आहेत जिथे लष्करी नेत्यांना राजकीय आकांक्षा असतात. मात्र, भारतीय लष्कर दलांची अशी कोणतीही इच्छा नाही, असे मोहंती यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखIndian Armyभारतीय जवान