शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गोमुत्राने कॅन्सर बरा होतो, साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 18:12 IST

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला.

भोपाळ : शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एक नवा शोध लावला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या विधानामुळे त्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. गोमुत्रामुळे माणसाचा कॅन्सर बरा होतो असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एका आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

यावेळी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. पंचगव्य म्हणजे गोबर, दही, गोमूत्र अशा गोष्टींपासून बनवलेलं औषध शारिरीक आजारांना बरं करतं. त्याचबरोबर गायच्या चेहऱ्यावरुन हात फिरवल्यानंतर गाईला आणि माणसाला दोघांनाही सुख मिळतं असंही त्यांनी सांगितले. तसेच माझा कॅन्सर त्याचमुळे बरा झाल्याचंही साध्वी यांनी सांगितले.   

भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यावर शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर जोरदार टीका झाली. भाजपानेही त्यांच्या वक्तव्यापासून फारकत घेत साध्वी यांचे ते वैयक्तिक मत होतं असं सांगितलं त्यानंतर साध्वी यांनी करकरेंबद्दल केलेले विधान मागे घेतलं. मालेगाव स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह या प्रमुख आरोपी आहेत. 9 वर्षं या प्रकरणी तुरुंगात राहिल्यानंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनाही कॅन्सर झाला होता आणि आपल्या कॅन्सरवरही आपणच इलाज केला, असेही सांगायला साध्वी विसरल्या नाहीत.

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भव्य रोड शो काढला. या रोड शोमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते हातात मै हिंदू भगवाधारी हू अशा प्रकारचे पोस्टर्स हातात घेतले होते. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या रॅलीत सहभागी झालेले बहुसंख्य कार्यकर्ते भगवे कपडे परिधान करुन आले होते. मध्य प्रदेशच्या राज्यभरातून अनेक साधू साध्वी यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये दाखल झाले होते. या रॅलीमुळे जुन्या भोपाळ शहरात वाहतुक कोंडीचा सामना लोकांना करावा लागला. रोड शोनंतर आयोजित केलेल्या सभेत भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृती रक्षणासाठी साधू-संतांना पुढे येणे गरजेचे आहे. माझ्यावर अनेक अत्याचार झाले. मी प्रत्येक छळाला समोर गेली आहे. विरोधक भगवा दहशतवाद म्हणतात मात्र हिंदुत्व विकासाचा पर्याय आहे असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcowगायSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरcancerकर्करोगMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019bhopal-pcभोपाळ