शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

गोमुत्राने कॅन्सर बरा होतो, साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 18:12 IST

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला.

भोपाळ : शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एक नवा शोध लावला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या विधानामुळे त्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. गोमुत्रामुळे माणसाचा कॅन्सर बरा होतो असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एका आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

यावेळी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. पंचगव्य म्हणजे गोबर, दही, गोमूत्र अशा गोष्टींपासून बनवलेलं औषध शारिरीक आजारांना बरं करतं. त्याचबरोबर गायच्या चेहऱ्यावरुन हात फिरवल्यानंतर गाईला आणि माणसाला दोघांनाही सुख मिळतं असंही त्यांनी सांगितले. तसेच माझा कॅन्सर त्याचमुळे बरा झाल्याचंही साध्वी यांनी सांगितले.   

भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यावर शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर जोरदार टीका झाली. भाजपानेही त्यांच्या वक्तव्यापासून फारकत घेत साध्वी यांचे ते वैयक्तिक मत होतं असं सांगितलं त्यानंतर साध्वी यांनी करकरेंबद्दल केलेले विधान मागे घेतलं. मालेगाव स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह या प्रमुख आरोपी आहेत. 9 वर्षं या प्रकरणी तुरुंगात राहिल्यानंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनाही कॅन्सर झाला होता आणि आपल्या कॅन्सरवरही आपणच इलाज केला, असेही सांगायला साध्वी विसरल्या नाहीत.

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भव्य रोड शो काढला. या रोड शोमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते हातात मै हिंदू भगवाधारी हू अशा प्रकारचे पोस्टर्स हातात घेतले होते. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या रॅलीत सहभागी झालेले बहुसंख्य कार्यकर्ते भगवे कपडे परिधान करुन आले होते. मध्य प्रदेशच्या राज्यभरातून अनेक साधू साध्वी यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये दाखल झाले होते. या रॅलीमुळे जुन्या भोपाळ शहरात वाहतुक कोंडीचा सामना लोकांना करावा लागला. रोड शोनंतर आयोजित केलेल्या सभेत भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृती रक्षणासाठी साधू-संतांना पुढे येणे गरजेचे आहे. माझ्यावर अनेक अत्याचार झाले. मी प्रत्येक छळाला समोर गेली आहे. विरोधक भगवा दहशतवाद म्हणतात मात्र हिंदुत्व विकासाचा पर्याय आहे असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcowगायSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरcancerकर्करोगMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019bhopal-pcभोपाळ