शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना मृत्यूच्या खोट्या दाव्यांची चौकशी होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 06:45 IST

४ राज्यांतील ५% दाव्यांची होऊ शकते शहानिशा

नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानासाठी करण्यात आलेल्या खोट्या दाव्यांबाबत केंद्र सरकारला चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली आहे.न्या. एम. आर. शहा आणि न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या न्यायपीठाने म्हटले की,   महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील पाच टक्के दाव्यांची  सरकार शहानिशा करू शकते. या राज्यांतील दाव्यांची संख्या आणि नोंदणीकृत मृतांच्या संख्येदरम्यान मोठी तफावत होती.सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्यास पात्र अशा लोकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ६० दिवसांचा अवधी निर्धारित केला आहे. भविष्यातील दावेदारांसाठी ९० दिवसांचा अवधी निर्धारित केला आहे.कोरानामुळे मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदानासाठी दावा करण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी निर्धारित करण्याची मागणी करून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या   अनुदानासाठी खोटे दावे करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.न्यायालयाने व्यक्त केली होती नाराजीसानुग्रह अनुदान वाटप न करण्यात आल्याप्रकरणी नाराजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेही होते.  मृत्यूच्या दाखल्यात मृत्यूचे कारण कोरोना नमूद नाही म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान नाकारले जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करून कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या पुराव्यासह अर्ज सादर केल्यास ३० दिवसांच्या आत भरपाई देण्यात यावी, असे म्हटले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय