शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

चीनमधील कोरोना विस्फोटामुळे संपूर्ण जगात दहशत, भारत अलर्ट मोडवर; धडाधड घेतले निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 19:19 IST

कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा चीनमध्ये कहर करत असताना आता जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येनं जगभरातील देशांना धडकी भरली आहे.

नवी दिल्ली-

कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा चीनमध्ये कहर करत असताना आता जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येनं जगभरातील देशांना धडकी भरली आहे. आज भारताच्या आरोग्य विभागानं तातडीनं एक बैठक बोलावली आणि महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. कोणत्याही कठीण परिस्थिला सामोरं जाण्यासाठी संपूर्ण तयारी आहे असा दावा सरकारनं केला आहे. कोरोनामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला याआधीच मोठा धक्का बसला आहे आणि पुन्हा एकदा असा धक्का सहन करणं नुकसानदायक ठरू शकतं. 

चीनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाच्या ३६ लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० हजार रुग्णांनी प्राण गमावले आहेत. चीनसह अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर अमेरिका, जर्मनी आणि तैवान सारख्या देशांमध्येही रुग्णवाढ होत आहे. 

चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेरइतर देशांच्या तुलनेत चीनमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. चीनच्या चोंगकिंग शहरातील काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यात रुग्णांसह डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. तसंच रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नसल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. 

जागतिक बँकेनं वाढीचा अंदाज केला कमीचीनमध्ये कोरोना हातपाय पसरू लागल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक बँकेनं आपल्या ताज्या अहवालात चीनच्या अंदाजित विकास दरात मोठी घट केली आहे. वर्ल्डबँकेनं चीनचा अंदाजित विकास दरात घट करून २.७ टक्के इतका केला. याआधी जून महिन्यात हाच दर ४.३ टक्के राहील असं जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या सहा महिन्यात १.६ टक्के घट झाली आहे. इतकंच नाही, तर जागतिक बँकेनं २०२३ या वर्षासाठी वाढीचा दर ८.१ टक्क्यांहून थेट ४.३ टक्के इतका केला आहे. 

भारताला चिंता करण्याची गरज नाहीचीनमधील कोरोना विस्फोटामुळे भारत सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे. सरकारच्या दाव्यानुसार देशातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सरकार सज्ज आहे. तसंच कोरोना गेलेला नाही त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली. यात निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी बैठकीनंतर भारतातील जनतेनं पॅनिक होण्याचं काही कारण नाही. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि बूस्टर डोस जरूर घ्यावा असं आवाहनही डॉ. पॉल यांनी केलं आहे. 

आवश्यक पावलं उचलणारदेशाची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचं आरोग्य लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाला कोणतीही चूक करायची नाही. डॉ. पॉल म्हणाले की देशात कोरोना चाचण्या योग्य प्रमाणात होत आहेत. परिस्थितीवर सरकार गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे आणि गरजेनुसार निर्णय घेतले जातील. कोरोनाच्या याआधीच्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. असं असतानाही भारतानं कमबॅक करत जगासमोर आदर्श निर्माण केला आणि जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून देश उदयास आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन