शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 13:07 IST

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत.

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार नागरिकांनी अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे. जगात अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यानं धडक दिल्याचं सांगितलं जात आहे. जगात कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यात भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जगातील एकंदर ट्रेंड पाहता पुढील १०० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचं मानले जात आहेत. (covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india)

जगातील कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढदेशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी जगात अनेक देशांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही धोक्याची घंटा ठरू शकते. जगभरातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता या आठवड्यात ३३.७६ लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हीच संख्या २९.२२ लाख इतकी होती. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहिला तर लक्षात येतं की रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी येणाऱ्या संकटाची चाहूल तर ठरताना दिसत आहे. स्पेनमध्ये सध्या कोरोनानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेनमध्ये एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ६४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर नेदरलँडमध्ये जवळपास ३०० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

भारतात कोरोना रुग्णसंख्येतील घट धीम्या गतीनंदक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलँडमध्ये कोरोना रुग्णसंख्येच अचानक वाढ होताना दिसून येत आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी आधीच्या तुलनेत रुग्णघटीचा वेग अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे भारतावरही तिसऱ्या लाटेच्या संकटाची टांगती तलवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा नागरिकांना तिसऱ्या लाटेसंदर्भात सतर्क केलेलं आहे. 

८ टक्क्यांहून कमी लोकांचं लसीकरणदेशात कोरोना लसीकरण मोहिम सुरू होऊन काहीच महिने उलटले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. गेल्या ६ महिन्यात देशातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ ८ टक्के लोकांचंच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंतचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य कसं पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ४० कोटी नागरिकांचच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग पाहता तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस