शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 13:07 IST

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत.

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार नागरिकांनी अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे. जगात अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यानं धडक दिल्याचं सांगितलं जात आहे. जगात कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यात भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जगातील एकंदर ट्रेंड पाहता पुढील १०० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचं मानले जात आहेत. (covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india)

जगातील कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढदेशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी जगात अनेक देशांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही धोक्याची घंटा ठरू शकते. जगभरातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता या आठवड्यात ३३.७६ लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हीच संख्या २९.२२ लाख इतकी होती. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहिला तर लक्षात येतं की रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी येणाऱ्या संकटाची चाहूल तर ठरताना दिसत आहे. स्पेनमध्ये सध्या कोरोनानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेनमध्ये एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ६४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर नेदरलँडमध्ये जवळपास ३०० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

भारतात कोरोना रुग्णसंख्येतील घट धीम्या गतीनंदक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलँडमध्ये कोरोना रुग्णसंख्येच अचानक वाढ होताना दिसून येत आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी आधीच्या तुलनेत रुग्णघटीचा वेग अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे भारतावरही तिसऱ्या लाटेच्या संकटाची टांगती तलवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा नागरिकांना तिसऱ्या लाटेसंदर्भात सतर्क केलेलं आहे. 

८ टक्क्यांहून कमी लोकांचं लसीकरणदेशात कोरोना लसीकरण मोहिम सुरू होऊन काहीच महिने उलटले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. गेल्या ६ महिन्यात देशातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ ८ टक्के लोकांचंच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंतचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य कसं पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ४० कोटी नागरिकांचच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग पाहता तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस