शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 13:07 IST

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत.

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार नागरिकांनी अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे. जगात अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यानं धडक दिल्याचं सांगितलं जात आहे. जगात कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यात भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जगातील एकंदर ट्रेंड पाहता पुढील १०० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचं मानले जात आहेत. (covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india)

जगातील कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढदेशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी जगात अनेक देशांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही धोक्याची घंटा ठरू शकते. जगभरातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता या आठवड्यात ३३.७६ लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हीच संख्या २९.२२ लाख इतकी होती. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहिला तर लक्षात येतं की रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी येणाऱ्या संकटाची चाहूल तर ठरताना दिसत आहे. स्पेनमध्ये सध्या कोरोनानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेनमध्ये एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ६४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर नेदरलँडमध्ये जवळपास ३०० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

भारतात कोरोना रुग्णसंख्येतील घट धीम्या गतीनंदक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलँडमध्ये कोरोना रुग्णसंख्येच अचानक वाढ होताना दिसून येत आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी आधीच्या तुलनेत रुग्णघटीचा वेग अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे भारतावरही तिसऱ्या लाटेच्या संकटाची टांगती तलवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा नागरिकांना तिसऱ्या लाटेसंदर्भात सतर्क केलेलं आहे. 

८ टक्क्यांहून कमी लोकांचं लसीकरणदेशात कोरोना लसीकरण मोहिम सुरू होऊन काहीच महिने उलटले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. गेल्या ६ महिन्यात देशातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ ८ टक्के लोकांचंच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंतचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य कसं पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ४० कोटी नागरिकांचच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग पाहता तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस