शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कृषी कायद्यांवरून कोर्टाची सरकारला नोटीस; चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 03:19 IST

संसदेने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे कृषी बाजार उत्पन्न समित्यांची यंत्रणाच खिळखिळी होणार आहे. कृषी उत्पादनाला योग्य तो भाव मिळावा म्हणून कृषी बाजार उत्पन्न समित्यांची स्थापना करण्यात आली होती.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अमलात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर द्यावे, यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकारकडून चार आठवड्यांच्या आत उत्तर मागविले आहे. हमीभाव व कृषीसेवा कायदा, कृषी उत्पादनाचा व्यापार व वाणिज्यविषयक बाबी कायदा, जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा या तीन कायद्यांची २७ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात आली.

या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभेतील खासदार मनोज झा, केरळमधील काँग्रेसचे लोकसभा खासदार टी.एन. प्रतापन, तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे राज्यसभा खासदार तिरुची शिवा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. तसेच अशीच एक याचिका राकेश वैष्णव यांनीही केली आहे. संसदेने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे कृषी बाजार उत्पन्न समित्यांची यंत्रणाच खिळखिळी होणार आहे. कृषी उत्पादनाला योग्य तो भाव मिळावा म्हणून कृषी बाजार उत्पन्न समित्यांची स्थापना करण्यात आली होती.घटक पक्षही झाले नाराजकेंद्र सरकारने अमलात आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमध्ये मोठे आंदोलन सुरू झाले. तीन कृषी विधेयके संसदेत संमत करू नका, अशी शिरोमणी अकाली दलाने केलेली मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमान्य केली होती. त्यामुळे या पक्षाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला. तरीही मोदींनी ही तीनही कृषी विधेयके संसदेत संमत करून घेतली. बिगरभाजपची सरकारे असलेल्या राज्यांनी या तीन कृषी कायद्यांना विरोध चालविला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयagricultureशेती