शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

...अन् 'त्यांचं' सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्नासाठी पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:13 IST

एका प्रेमी जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका प्रेमी जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं आहे. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रेम विवाहासाठी घरातून पळालेल्या प्रेमी जो़डप्याचा भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तरुणाच्या चुलत भावाचादेखील या अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे संसार सुरू होण्याआधीच त्याचा भयावह शेवट झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच तिघांचेही मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. ही घटना कोतावली परिसरातील रेल्वे फ्लायओव्हरजवळ रविवारी रात्री साधारण 12 वाजता घडली. पोलीस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक जगदीश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा चुलत भाऊ आणि तरुणी बाईकवरुन जात होते. रेल्वे फ्लायओव्हरजवळ एका अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला. तिघांची आता ओळख पटली आहे.

तरुण आणि तरुणीचा जागेवरच मृत्यू 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही एकाच गावचे रहिवासी आहेत. तरुण आणि तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. तरुणाचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने पोलिसांना तरुण-तरुणीचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळाले होते. तरुण त्यांना सोडण्यासाठी कासगंज जात होता. याचदरम्यान हा भीषण अपघात घडला अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात