शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्यांचं' सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्नासाठी पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:13 IST

एका प्रेमी जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका प्रेमी जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं आहे. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रेम विवाहासाठी घरातून पळालेल्या प्रेमी जो़डप्याचा भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तरुणाच्या चुलत भावाचादेखील या अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे संसार सुरू होण्याआधीच त्याचा भयावह शेवट झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच तिघांचेही मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. ही घटना कोतावली परिसरातील रेल्वे फ्लायओव्हरजवळ रविवारी रात्री साधारण 12 वाजता घडली. पोलीस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक जगदीश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा चुलत भाऊ आणि तरुणी बाईकवरुन जात होते. रेल्वे फ्लायओव्हरजवळ एका अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला. तिघांची आता ओळख पटली आहे.

तरुण आणि तरुणीचा जागेवरच मृत्यू 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही एकाच गावचे रहिवासी आहेत. तरुण आणि तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. तरुणाचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने पोलिसांना तरुण-तरुणीचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळाले होते. तरुण त्यांना सोडण्यासाठी कासगंज जात होता. याचदरम्यान हा भीषण अपघात घडला अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात