शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

अरे व्वा! गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नाचा नवस पूर्ण; राम मंदिरापर्यंत 900 किमी चालत निघालं कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:19 IST

कडाक्याच्या थंडीत नवविवाहित कपल पायीच अयोध्येला जायला निघालं आहे. हे दोघेही तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

राम मंदिरामुळे रामभक्तांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, कडाक्याच्या थंडीत नवविवाहित कपल पायीच अयोध्येला जायला निघालं आहे. हे दोघेही तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. बिहारमधील कटिहार येथून पायी येत आहे. दोघे नुकतेच उत्तर प्रदेशातील बलिया येथे पोहोचले आहेत. रस्त्यात अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे.

कटिहारहून अयोध्येला जाणार्‍या रोशन कुमारने दिलेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह नीट संपन्न झाल्यास रामाच्या दर्शनासाठी पायी जाईन असं म्हटलं होतं. नुकतीच त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत आता तो पत्नी रोशनीसह अयोध्येला रवाना झाला आहे. दोघे मिळून 900 किलोमीटरचा प्रवास करतील.

"भगवान रामाकडे माझी एकच इच्छा आहे की, आमचं कुटुंब सुखी ठेव. देशवासीयांनाही खूश ठेव. थंडीमुळे त्रास होत असला तरी मनोकामना पूर्ण झाल्याच्या आनंदात राम मंदिरात नक्की जाणार आहे. रस्त्यात लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. 22 जानेवारीनंतर जेव्हाही संधी मिळेल तेव्हा दर्शन घेऊ" असं रोशनने सांगितलं. 

रोशन आणि त्याच्या पत्नीच्या पाठीवर बॅग आहे. बॅगेत प्रभू श्रीरामाचा ध्वज आहे. 'कटिहार ते अयोध्या' असा बॅनरही आहे. ते 22 जानेवारीपर्यंत अयोध्येला पोहोचतील अशी आशा आहे. यानंतर त्यांना जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ते दर्शन घेणार आहेत.  रोशनी कुमारी म्हणते की, आमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये बदलल्याबद्दल देवाचे आभार. घरच्यांनी अगदी सहज होकार दिला. त्यामुळे आमच्या इच्छेनुसार आम्ही दोघं पायीच अयोध्येला जात आहोत. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 23 जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले होणार आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याmarriageलग्न