शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हृदयद्रावक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्न करायला निघालेल्या कपलचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 14:32 IST

अपघातात तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघंही लग्न करणार होते. तर आणखी एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. 

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्रधरपूर-चाईबासा मुख्य मार्ग NH-75 (E) वर रविवारी दुपारी एका भरधाव ट्रकने बाईकवर असलेल्या तिघांना चिरडलं. या अपघातात तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघंही लग्न करणार होते. तर आणखी एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. 

दोन्ही प्रेमी लग्न करणार होते. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून उत्तम उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जमशेदपूरला पाठवण्यात आले. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रकचालकाला आसपासच्या ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, इटीहासा पंचायतीच्या डुईकासाई गावातील निवासी रमेश केराई आणि नरसिंह केराई हे बाईकवरून तांतनगर ओपी परिसरातील कुलाबुरू गावात गेले होते. रमेश केराई हा आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी बाईकवरून चक्रधरपूरकडे जात होता. याच दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या बाईकला चिरडले. यामध्ये रमेश केराई आणि त्याच्या प्रेयसीचा अपघातात मृत्यू झाला. तर नरसिंग केराई हे गंभीर जखमी झाले.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून त्याच्या ताब्यात दिले. तर गंभीर जखमी नरसिंह केराई याला प्राथमिक उपचारासाठी चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जामुदा यांनी प्रशासनाला बचावकार्यात मदत केली. मुफसिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेला.  

टॅग्स :Accidentअपघात