शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:40 IST

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांनी घरात घुसून पती, गर्भवती पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाची हत्या केली.मुर्शिदाबादच्या जियागंज परिसरात ही घटना घडली.

मुर्शिदाबाद - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांनी घरात घुसून पती, गर्भवती पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. मुर्शिदाबादच्या जियागंज परिसरात ही घटना घडली. धारदार शस्त्रांचा वापर करून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधू प्रकाश पाल (35) यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतच पाल यांची पत्नी आणि लहान मुलाचीही हत्या करण्यात आली आहे. बंधू प्रकाश पाल हे गोसाईंग्राममधील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी गर्भवती होती. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. शेजाऱ्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी या तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले. धारदार शस्त्रांचा वापर करून या तिघांची हत्या करण्यात आली आहे.

बंधू प्रकाश पाल हे आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचा दावा आरएसएसच्या काही लोकांनी केला आहे. पश्चिम बंगालराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे नेते जिष्णु बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधु प्रकाश आरएसएस कार्यकर्ता होते आणि काही दिवसांपूर्वी ते 'साप्ताहिक मिलन' मध्ये सहभागी झाले होते. तसेच भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विट करून या घटनेमुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसल्याचं सांगितलं आहे. 

'पाल हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. गेल्या 20 वर्षांपासून ते शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मूळचे ते शाहपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मात्र आता मुलाच्या शिक्षणासाठी मुर्शिदाबाद येथे शिफ्ट झाले आहेत. त्याचा कोणाशी वाद होता का यासंबंधी आपल्याला काही माहिती नाही' अशी माहिती पाल यांचे भाऊ सुजॉय घोष यांनी दिली आहे. पोलीस या हत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :MurderखूनRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघwest bengalपश्चिम बंगाल