शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:39 IST

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.

अलिबाग : देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना वेळीच हिसका दाखवला पाहिजे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या अधिवेशनाचे सुप शनिवारी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात वाजले त्याप्रसंगी पटेल बोलत होते.संभाजी ब्रिगेड ही सामाजिक विचारांची अशी चळवळ आहे, जी राजकारणाला कलाटणी देऊ शकते. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापसात न भांडता आपला शत्रू कोण आहे, हे ओळखून रयतेचे राज्य आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्यावर प्रकाश टाकल्याने त्यांच्याविरोधात कारस्थान केल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट करून वर्मा यांना क्लीन चिट दिली, तर आस्थाना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.देशाचा खरा इतिहास बदलणाºयांना संभाजी ब्रिगेडने रोखण्याचे काम केले आहे. त्यामुळे इतिहास आणि संविधान बदलण्याची भाषा करणाºयांना आता रोखण्याची गरज असल्याचे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. भगवा आणि तिरंगा वापरण्याची परवानगी कोणलाही देण्यात येऊ नये. झेंड्याच्या नावावर राज्य जिंकणाºयांना छत्रपतींचा विसर पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अभिजन विरुद्ध बहुजन असा लढा उभा राहिला आहे. एकजुटीने ही लढाई लढण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी