शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:39 IST

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.

अलिबाग : देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना वेळीच हिसका दाखवला पाहिजे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या अधिवेशनाचे सुप शनिवारी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात वाजले त्याप्रसंगी पटेल बोलत होते.संभाजी ब्रिगेड ही सामाजिक विचारांची अशी चळवळ आहे, जी राजकारणाला कलाटणी देऊ शकते. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापसात न भांडता आपला शत्रू कोण आहे, हे ओळखून रयतेचे राज्य आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्यावर प्रकाश टाकल्याने त्यांच्याविरोधात कारस्थान केल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट करून वर्मा यांना क्लीन चिट दिली, तर आस्थाना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.देशाचा खरा इतिहास बदलणाºयांना संभाजी ब्रिगेडने रोखण्याचे काम केले आहे. त्यामुळे इतिहास आणि संविधान बदलण्याची भाषा करणाºयांना आता रोखण्याची गरज असल्याचे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. भगवा आणि तिरंगा वापरण्याची परवानगी कोणलाही देण्यात येऊ नये. झेंड्याच्या नावावर राज्य जिंकणाºयांना छत्रपतींचा विसर पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अभिजन विरुद्ध बहुजन असा लढा उभा राहिला आहे. एकजुटीने ही लढाई लढण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी