शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 06:50 IST

६०१ रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त खाटा सज्ज; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

नवी दिल्ली : रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण २० टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या १ हजार ६७१ आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. श्वसनास अडथळा येतो, व्हेंटिलेटर लावावे लागते असे रुग्ण गंभीर श्रेणीत येतात. अशांची संख्या १६७१ आहे.

२९ मार्चला देशात ९७९ रुग्ण होते. त्यांच्यापैकी १८६ जण गंभीर होते. त्या वेळी राज्यांमधील १६३ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १४,९०० बेड्स उपलब्ध होते. ११ एप्रिलला गंभीर रुग्णांची संख्या १६७१ वर पोहोचली. मात्र त्यासाठी ६०१ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त बेड्स सज्ज आहेत. एम्स, सफदरजंग, मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे उदाहरण त्यांनी दिले. एम्समध्ये २५० बेड्स तयार असून त्यातील ५० आयसीयू बेड्स आहेत. सफदरजंगमध्ये ही संख्या ५०० असून १०० आयसीयू बेड्स आहेत. लष्कराने दहा शहरांमधील रुग्णालयात ९ हजार बेड्स तयार केले आहेत. आॅर्डनन्स फॅक्टरीने ५० टेंट्स सज्ज ठेवले असून त्यात एकावेळी दोन जणांवर उपचार होऊ शकतील. ४८ तासांमध्ये ७४ जण कोरोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

देशात ९१८ रुग्ण : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ९,२०४ वर गेली आहे. यापैकी २ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत या संसर्गजन्य आजाराने भारतात ३२९ जण मरण पावले आहेत.राज्यातील नव्या २२१ रुग्णांपैकी १५२ जण मुंबईतीलच्राज्यात रविवारी कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील १५२ रुग्ण मुंबईतील असून आता राज्याची एकूण रुग्णसंख्या २ हजार २७ झाली आहे. राज्यात रविवारी २५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील १६ मृत्यू मुंबईतील आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही १५२ वर पोहोचला आहे.च्आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या