शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 06:50 IST

६०१ रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त खाटा सज्ज; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

नवी दिल्ली : रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण २० टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या १ हजार ६७१ आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. श्वसनास अडथळा येतो, व्हेंटिलेटर लावावे लागते असे रुग्ण गंभीर श्रेणीत येतात. अशांची संख्या १६७१ आहे.

२९ मार्चला देशात ९७९ रुग्ण होते. त्यांच्यापैकी १८६ जण गंभीर होते. त्या वेळी राज्यांमधील १६३ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १४,९०० बेड्स उपलब्ध होते. ११ एप्रिलला गंभीर रुग्णांची संख्या १६७१ वर पोहोचली. मात्र त्यासाठी ६०१ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त बेड्स सज्ज आहेत. एम्स, सफदरजंग, मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे उदाहरण त्यांनी दिले. एम्समध्ये २५० बेड्स तयार असून त्यातील ५० आयसीयू बेड्स आहेत. सफदरजंगमध्ये ही संख्या ५०० असून १०० आयसीयू बेड्स आहेत. लष्कराने दहा शहरांमधील रुग्णालयात ९ हजार बेड्स तयार केले आहेत. आॅर्डनन्स फॅक्टरीने ५० टेंट्स सज्ज ठेवले असून त्यात एकावेळी दोन जणांवर उपचार होऊ शकतील. ४८ तासांमध्ये ७४ जण कोरोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

देशात ९१८ रुग्ण : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ९,२०४ वर गेली आहे. यापैकी २ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत या संसर्गजन्य आजाराने भारतात ३२९ जण मरण पावले आहेत.राज्यातील नव्या २२१ रुग्णांपैकी १५२ जण मुंबईतीलच्राज्यात रविवारी कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील १५२ रुग्ण मुंबईतील असून आता राज्याची एकूण रुग्णसंख्या २ हजार २७ झाली आहे. राज्यात रविवारी २५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील १६ मृत्यू मुंबईतील आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही १५२ वर पोहोचला आहे.च्आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या