शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 06:50 IST

६०१ रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त खाटा सज्ज; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

नवी दिल्ली : रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण २० टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या १ हजार ६७१ आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. श्वसनास अडथळा येतो, व्हेंटिलेटर लावावे लागते असे रुग्ण गंभीर श्रेणीत येतात. अशांची संख्या १६७१ आहे.

२९ मार्चला देशात ९७९ रुग्ण होते. त्यांच्यापैकी १८६ जण गंभीर होते. त्या वेळी राज्यांमधील १६३ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १४,९०० बेड्स उपलब्ध होते. ११ एप्रिलला गंभीर रुग्णांची संख्या १६७१ वर पोहोचली. मात्र त्यासाठी ६०१ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त बेड्स सज्ज आहेत. एम्स, सफदरजंग, मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे उदाहरण त्यांनी दिले. एम्समध्ये २५० बेड्स तयार असून त्यातील ५० आयसीयू बेड्स आहेत. सफदरजंगमध्ये ही संख्या ५०० असून १०० आयसीयू बेड्स आहेत. लष्कराने दहा शहरांमधील रुग्णालयात ९ हजार बेड्स तयार केले आहेत. आॅर्डनन्स फॅक्टरीने ५० टेंट्स सज्ज ठेवले असून त्यात एकावेळी दोन जणांवर उपचार होऊ शकतील. ४८ तासांमध्ये ७४ जण कोरोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

देशात ९१८ रुग्ण : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ९,२०४ वर गेली आहे. यापैकी २ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत या संसर्गजन्य आजाराने भारतात ३२९ जण मरण पावले आहेत.राज्यातील नव्या २२१ रुग्णांपैकी १५२ जण मुंबईतीलच्राज्यात रविवारी कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील १५२ रुग्ण मुंबईतील असून आता राज्याची एकूण रुग्णसंख्या २ हजार २७ झाली आहे. राज्यात रविवारी २५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील १६ मृत्यू मुंबईतील आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही १५२ वर पोहोचला आहे.च्आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या