शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
6
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
7
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
8
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
9
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
10
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
11
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
12
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
13
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
14
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
15
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
16
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
17
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
18
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
19
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
20
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

देशात भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण, नसिरुद्दीन शाहांचे पुन्हा टीकास्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 22:04 IST

भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे.

ठळक मुद्देदेशात सध्या भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण सरलेले वर्ष हे विचार स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची गळचेपी करणारे ठरलेनव्या वर्षात आपल्या घटनात्मक अधिकारांसाठी उभे राहण्याची आणि ही अंधाधुंदी संपवा, असे सरकारला बजावण्याची वेळ आली आहे

नवी दिल्ली - भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. या देशात सध्या भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण आहे, अशी टीका केली आहे.  अॅम्नेस्टी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नसिरुद्दीन शाह यांचे हे वक्तव्य ट्विट करण्यात आले आहे. त्यात नसिरुद्दीन शाह म्हणतात की, ''सध्या या देशामध्ये भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरलेले वर्ष हे विचार स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची गळचेपी करणारे ठरले. आता नव्या वर्षात आपल्या घटनात्मक अधिकारांसाठी उभे राहण्याची आणि ही अंधाधुंदी संपवा, असे सरकारला बजावण्याची वेळ आली आहे.''

दरम्यान,  समाजात विष पसरल्यानं आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान  नसीरुद्दीन शाह यांनी केले होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर भाष्य करताना शाह यांनी भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आता गाईचा जीवन माणसापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. या वक्तव्यावरून वाद झाल्यावर शाह यांनी  त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. मी देशद्रोही नाही. देशावर टीका करताना मला दु:ख होते. मात्र चुकीचे वाटल्यास त्यावर मी अवश्य बोलणार. मला देशाच्या भविष्याची चिंता वाटते. माझ्या 4 पिढ्या या देशात जन्मल्या. माझा जन्मदेखील याच देशात झाला. माझी मुलंदेखील इथंच राहणार आहेत. माझे देशावर खूप प्रेम आहे. मात्र त्यासाठी मला गोंधळ घालण्याची आवश्यकता वाटत नाही, असे त्यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Naseeruddin Shahनसिरुद्दीन शाहIndiaभारतdemocracyलोकशाहीGovernmentसरकार